शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यासाठी कलम ३७ (१)चा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी जारी केला असून, प्रतिबंध करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.हा आदेश ५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतीही शस्त्रे बाळगू नयेत, ज्वालागृही पदार्थाची वाहतूक करु नये, मोर्चा, निदर्शने, आंदोलनासारख्या बाबींची प्रदर्शन करु नये, विविध समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करु नये असे आदेशात म्हटले आहे.तसेच या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. हा आदेश लग्न, अंत्ययात्रा, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे, सभा पूर्वपरवानगी घेऊन केले असल्यास त्यांना लागू होणार नाही.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























