जालन्यातील प्लास्टिक कचऱ्यापासून प्लास्टिक विटा तयार करणार्या सृष्टी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेला जेईएस महाविद्यालयाच्या मागील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केंद्रात जालना जालना शहर महानगरपालिका च्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आज याच उपक्रमाचा शुभारंभ जेष्ठ ह्रदयरोग तज्ञ डाॅ.हितेश रायठठ्ठा यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, सुनीलभाई रायठठ्ठा,अरुण अग्रवाल, डाॅ.दिपक मंत्री,डाॅ,आरती मंत्री,भाजप चे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अशोक पांगारकर, डाॅ,नम्रता काबरा,पुसाराम मुंदडा, संजय राठी,प्रविण पवार, उदय शिंदे,धीरज मेवाडे,सौ.पित्ती वर्षा,मनापचे स्वच्छता प्रमुख पवार, पाणी पुरवठा प्रमुख संजय वाघमारे आणि प्रकल्प प्रमुख प्रतिभा श्रीपत या उपस्थित होत्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...