वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात बिगरहिंदूंना प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्या. प्रितीकर दिवाकर आणि न्या. आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने आज, मंगळवारी ही याचिका फेटाळून लावली.
राखी सिंह आणि इतरांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत मागणी करण्यात आली होती की, “श्रृंगार गौरी केसमध्ये जोपर्यंत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय येत नाही. तोपर्यंत परिसरात बिगरहिंदूंना प्रवेशबंदी करण्यात यावी आणि ज्ञानवापी परिसरात मिळालेल्या हिंदू प्रतिकांना संरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच वाराणसीत श्री आदि विश्वेश्वर मंदिराच्या (सध्याचं ज्ञानवापी परिसर) प्राचीन अवशेषांना वाचवायचे आहे. तसेच यात असाही दावा करण्यात आला आहे की, वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदिर होते याठिकाणी भगवान शिवाने स्वतः ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती.