Tuesday, December 30, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टूल कीट टोळीच्या मायाजालात फसू नका- डॉ. मोहन भागवत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 24, 2023
in maharashtra
0
टूल कीट टोळीच्या मायाजालात फसू नका- डॉ. मोहन भागवत
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आपल्या देशातील आंतरिक असंतुष्टांना हाताशी धरून काही परदेशी शक्ती इथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतात हिंसा आणि असंतोष पसरावा याकरिता “टूल किट” सक्रिय केले जातात. तेव्हा असे फसवे मायाजाल आणि भ्रामक गोष्टींपासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सरंसंघचालक म्हणाले की, आपल्या समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. हे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणवत असले तरी 1920 च्या दशकातच ते मार्क्सला विसरले असून केवळ सत्ता प्राप्ती इतकेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

मणिपूरमधील हिंसेबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. भागवत म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक कलह का आणि कसा निर्माण झाला ? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का ? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मैतेई आणि कुकी समाजाच्या संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला ? यात बाह्य शक्तींचा हात होता का ? असा सवाल सरसंघचालकांनी उपस्थित केला. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल असे सरसंघचालकांनी सांगितले. देशात एकता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एकतेचेच तत्व दिले आहे. त्यांच्या आदर्शांवर देशाला चालावे लागेल. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल. सर्वांनी त्या भाषणांचा अभ्यास करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी केले.

शासन, क्रीडापटू आणि वैज्ञानिकांचे कौतुक
यावेळी सरसंघचालकांनी भारत सरकार, देशाचे वैज्ञानिक आणि क्रीडापटू यांचे कौतुक केले. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. भारताच्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले. तसेच चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताची शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकदेखील जगाने पाहिली. शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान आणि तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली. आपला देश सर्वच बाबतीत अग्रेसर होतो आहे. आर्थिक स्थितीतदेखील प्रगती दिसून येत आहे. स्टार्टअपची क्रांतीदेखील आपण पाहिल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.

मंदिरासोबत मनातही रामाची प्राणप्रतिष्ठा व्हावी
अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आगामी 22 जानेवारी रोजी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

मतदान प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य
यावेळी सरसंघचालकांनी मतदानावरदेखील भाष्य केले. आगामी 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 144
Previous Post

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिन’ जगभरातील सर्व स्वयंसेवकांना मन:पूर्वक शुभेच्छा !

Next Post

भावी पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचणे आवश्यक- शंकर महादेवन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भावी पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचणे आवश्यक- शंकर महादेवन

भावी पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचणे आवश्यक- शंकर महादेवन

ताज्या बातम्या

कबूतर खाण्यात प्रथमच घंटागाडीची घंटी वाजली

December 29, 2025

जनतेच्या समस्या वेळेवर सोडवा – उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड

December 29, 2025

कोंढार चिंचोलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव 

December 29, 2025

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

December 29, 2025

योगेश्वरी कॉलनीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहास प्रारंभ  

December 29, 2025

भाळवणी येथे ग्राहक प्रबोधन शिबिर संपन्न

December 29, 2025

दक्षिणमधील कारखान्यांकडून  ऊसदर जाहीर करण्यास टाळाटाळ

December 29, 2025

समस्या तात्पुरत्या नाही तर कायमस्वरूपी सोडवणार – इंद्रजित पवार

December 29, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

हॉटेल लोटसवर अजितदादा गट व शिंदेसेनेची युती

byतरुण भारत
December 29, 2025
0

सोलापूर - शिवसेना शिंदेगट व अजितदादा गटाच्या वतीने रविवारी दुपारी होडगी रोड येथील लोटस हॉटेल येथे बैठक घेण्यात आली. बैठकी...

भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आत्महत्याच्या धमकीनंतर दुसऱ्या कार्यकर्त्याने दिला आत्मदहनाचा इशारा 

byतरुण भारत
December 29, 2025
0

सोलापूर - महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात...

काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांच्या हाती मशाल

byतरुण भारत
December 28, 2025
0

सोलापूर - महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत. रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच...

“बघून घेतो”ची दमबाजी ठरली वादळी ! आघाडीचा असा ठरला फार्मूला

byतरुण भारत
December 28, 2025
0

सोलापूर - महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0587781

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697