मित्राची बाजू का घेतो या कारणावरून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना गंगापूर रोडवर घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे नाशिकमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
मित्राची बाजू का घेतो म्हणून किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केला. याप्रकरणी समशेद रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील वय 27 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त, स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहे.