यातुन पुढील चार सहा महिने काही ठराविक प्रकारच्या कंपन्यांचे अफाट उलाढाल होऊन अनेक ब्रँडसच्या शेअरमध्ये तेजी पण येईल त्यामुळे अभ्यासु ट्रेडर्स सुध्दा या लग्नाच्या सिजनची दरवर्षी आतुरतेनं वाट बघतात आणी ठराविक स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवून सहा महिन्यात बाहेरही पडतात.
सोने चांदी,वस्त्रोद्योग, तयार व टेलरिंग,मेक अप, परफ्यूम, डिओ, इवेंट कंपनी,डेकोरेशन (यात बरिच लिस्ट होईल),म्यारेज कोआर्डिनेटर,लग्न होणारी ठीकाणे,हॉटेल व्यवसाईक,मिठाईवाले,फोटो, फिल्म, कोरिओग्राफर आणी क्रू, गिफ्ट – भांडिकूंडी ते इलक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स, टुरिजम, डेस्टिनेशन वेडिंग, ट्रँवलिंग, विमान सेवा,अटोमोबिल,विविध सेवा सुविधा पुरवणारे,केटरर्स व फुड इंडस्ट्री (अन्नधान्य, फळे, फुले, लाईव स्टॉक),पाणी पुरवठा,टिश्यू पेपर्स,बँड, गायक, म्युजिकवाले, डांसवाले,इवेंटचे वीमा करणाऱ्या कंपन्या, पुरोहितत वर्ग, सर्व सेवा सुविधा आणी उत्पादनांच्या साठी सतत कार्यरत असणाऱ्या जाहिरात संस्था, मिडीया हाऊसफुल्ल स आणी प्रिंटिंग उद्योजग, आपल्यापैकी सर्वांना माहीत असणारी अशोक सराफ यांची बायको निवेदिता जोशी ची जशी टिवी सिरियल प्रोडक्शन कंपनी होता ती तशीच तीची म्यारेज कोओर्डिनेशनची पण कंपनी होतीच ज्यात दोन्ही कडच्या लोकांसह पार निमंत्रण ते बिदाई सोहळे यशस्वी प्लानंगसह पार पाडण्याची जबाबदारी असते आणी तीने अनेक वर्ष आनेक सोहळे अनेक सीजन आपल्या टिमसह यशस्वी पार पाडून या सिजनल उद्योगातही यशस्वी उद्यान जग म्हणून नांव कमावले होते असे कुठल्यातरी तिच्या मुलाखतीतून कळले होतेच.
जास्तीत जास्त ठरवुन खर्च करणाऱ्यात प्रमुख्याने मारवाडी, गुजराती, हरयानवी, सिंधी, शिख, संपुर्ण दक्षिण महाराष्ट्रीयन त्या मानाने कमी खर्चतात पण कमी म्हजे ३५-५० लाख गुंठेवारीतल्या नवश्रीमंतांनी तर ऊक दोन कोटी सहज खर्चलेले बघितले आहेतच.मागे पाच वर्ष जेव्हा मी भारतातील पहिल्या पाच अग्रणीतल्या एका आयटी कंपनीत ग्लोबल सीएमी स्टुडिओ हेड होतो आणी मारकॉमला पण प्रचंड मदत करत होतो तेव्हाही अनेकानेक सोहळे अटेंड केलेत त्यातील आमच्या सीईओ च्या मुलीचे दिल्लीत झालेले लग्न त्याच्या डिश साठी कायमचे स्मरणात राहिले त्याला तेव्हा ती डिश रु ९०००/- प्रती एक प्लेट अशी पडली होती. अर्थात तो तेव्हा काहिवर्षे तरी भारतातील सर्वात जास्त पगार असणारा सीईओ होता हे सांगणे न लगे. लग्नसोहळे हे म्हणजे तारेवरीच कसरत असते हे लक्षात घेतल तर हा धामधुमीचा काळ हा सर्वात आणी सर्वांगीण उलाढालीचा असतो ही च लक्षात येते.
Post Views: 90