दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येवरून कॅनडाने भारतावर बेताल आरोप केल्यामुळे दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली आहे.
यापूर्वी कॅनडाने मंगळवारी आपल्या नागरिकांना भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. तर बुधवारी भारतानेही असाच सल्ला जारी केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी जारी केली होती. ज्यामध्ये म्हटले होते की, कॅनडात सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया पाहता तेथे राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अलीकडच्या काळात, भारतीय मुत्सद्दी आणि कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या विशिष्ट वर्गाला धमकावले जात असल्याचे दिसून आले आहे. भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणारे हेच लोक आहेत.
ऍडव्हायझरीनुसार, कॅनडातील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता तेथे उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय समुदाय आणि विद्यार्थी उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वेबसाइटवर तक्रारी नोंदवू शकतात.दुसरीकडे, बुधवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली होती. यावर कॅनडाच्या हिंदूंनी जस्टिन ट्रुडो सरकारला पत्र लिहिले आहे. पत्रात पन्नूच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करण्यात आली असून याला द्वेषपूर्ण गुन्हा घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॅनेडियन हिंदू संघटना ‘हिंदू फोरम कॅनडा’ने सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लेन यांना हे पत्र लिहिले आहे. हिंदू संघटनेने आपल्या पत्रात म्हटले आहे की, पन्नू यांनी त्यांचे आणि त्यांच्या खलिस्तानी सहकाऱ्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. त्यांना त्यांच्या विचारधारेशी सहमत नसलेल्या लोकांना लक्ष्य करायचे आहे. कॅनडाच्या सरकारने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.पन्नूचे हे विधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घेतले जाणार का, असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे.