चित्रा वाघ म्हणाल्या, . मुलींना लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे. उत्तर प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा यायला पाहिजे’, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मांडली. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून पळवून नेलं जातं. धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. हे पाहता लव्ह जिहादचा कायदा आलाच पाहिजे, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. त्या पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होत्या.
महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून ठेवली पाहिजे. बोलताना मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळेल असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो करू नये. तो फार काळ टिकत नाही. अस म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यवर त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण ही बोलताना आपली भाषा नीट वापरली पाहिजे. शब्दांचा नीट उपयोग केला पाहिजे. महिलांनी बोलताना आपली एक रेषा आखून घेतली पाहिजे. संस्कृतीच्या बाहेर झालं असेल तर लोकांचा तो उद्वेग असतो, तो ते व्यक्त करतात. नीलम गोर्हे या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याबाबत असा वाद उद्भवला असं मी पाहिलं नाही. टाळ्या, शिट्ट्या अशी भाषा वापरली तरच मिळतात असा जर गैरसमज कोणाचा असेल तर तो करू नये, तो फार काळ टिकत नसतो. महिला आणि पुरुषांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेकांना कोपर खळ्या मारतो. प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोललं पाहिजे अस चित्रा वाघ म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, मुलींना पळवून नेणं, लग्नाचं अमिश दाखवणं, मुलींवर जबरदस्ती करणे, त्यांच्या आणि परिवारासाठी कुठलाच कायदा नाही. श्रद्धा वालकरची केस पुढे आल्याने हा विषय मोठा झाला आहे. आई वडिलांना ठोकर मारून तीने प्रेम केलं. त्या व्यक्तीवर विश्वास टाकला. तिचा अंत खूप वाईट झाला जो तिने कधीच विचार केला नसेल. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणून, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या आहेत.