अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये असलेले प्राचिन मंदिर म्हणजेच आनंदेश्वर मंदिर असून हे मंदिर पुरातन विभागाच्या ताब्यात असल्याने या मंदिराला कुणालाही हात लावता येत नाही त्यामुळे या मंदिराची दशा दिवसेंदिवस वाईट होत असून मंदिराच्या उभ्या खांबांना आडव्या बाजूने सुद्धा ठीक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत (तडे गेलेले आहे) लाखो रुपये पुरातन विभागातर्फे या मंदिराच्या नावावर खर्च केल्या जातो मातृत्व खर्च सर्व काही अनाठही असल्याचा आरोप रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर भाऊ ठाकूर यांनी केला आहे ते आज श्रावण सोमवार निमित्त दर्शनाला आले असता त्यांच्याही बाब निदर्शनास आली तेव्हा वस्तुस्थिती जाणून घेतली असता बऱ्याच ठिकाणी तडे गेलेले भेगा पडलेल्या दिसत आहेत परिसरात कितीतरी पोते चुना पडलेला आहे
तो पत्रांनी झाकून ठेवलेला आहे मात्र ऊन आणि पावसामुळे त्या चुन्याचे पोत्यांची बुट्टी पावडर झालेली आहे असे असतानाही तो चुना वापरल्या का गेला नाही तो चुना सुरक्षित ठिकाणी का ठेवला नाही असे अनेक प्रश्न किशोर ठाकूर यांनी व्यक्त केले आहे पुरातन विभागाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन अति पुरातन असलेल्या हेमाळ पंथी आनंदेश्वर मंदिराकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी अन्यथा ह्या भेगा जर वाढल्या शिवभक्तांना मंदिरात जाणे कठीण होईल व भीती निर्माण झालेली आहे तेव्हा त्वरित त्या मंदिराकडे अति पुरातन विभागाने लक्ष पुरवावे अशी मागणी रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर उपाध्यक्ष संतोष मिसाळ सचिव निलेश पारडे खजिनदार दत्ता पाटील कुंभारकर यांनी एका परिपत्रकाद्वारे केली आहे या संदर्भात त्वरित शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी अमरावती व आमदार बळवंत वानखडे यांना भेटून ही समस्या रेटून धरणार आहेत.