मुंबई, ३ ऑगस्ट (हिं.स.) : राज्य सरकारने सत्ताधारी पक्षाशी संबंधित ११ साखर कारखान्यांना १,५९० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून कर्ज मिळवण्यासाठी ही थकहमी आवश्यक होती. यापूर्वी सरकारने १३ साखर कारखान्यांसाठी १,८९८ कोटी रुपयांची थकहमी मंजूर केली होती.
नवीन यादीत, भाजप व अजित पवार गटाच्या नेत्यांचे कारखाने समाविष्ट आहेत, तर काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि बिपीन कोल्हे यांच्याशी संबंधित कारखाने वगळण्यात आले आहेत. हे निर्णय पुण्याच्या आणि अहमदनगरच्या स्थानिक राजकारणातील संघर्षांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बिपीन कोल्हे यांच्या कारखान्याला विरोध केल्याचे समजते.
थकहमी मिळालेले प्रमुख साखर कारखाने
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, बीड – ९७.७६ कोटी (अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके)श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा – ९४ कोटी (भाजप नेते प्रशांत परिचारक)वृधेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी – ९३ कोटी (भाजप आमदार मोनिका राजळे)लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा – १४० कोटी (अजित पवार गटाचे नेते नरेंद्र घुले-पाटील)किसनवीर सहकारी साखर कारखाना, वाई व खंडाळा – ४६७ कोटी (अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील)अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले – ९४ कोटी (भाजपचे नेते मधुकरराव पिचड)श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर – ३२७ कोटी (भाजपला समर्थन केलेले आमदार विनय कोरे)श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा – ९४ कोटी (भाजप नेते बसवराज पाटील)अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई – ८० कोटी (भाजप नेते रमेश आडसकर)शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा – १०३.४० कोटी (अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे)राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना मोठा फायदा होणार आहे, तर काँग्रेस नेत्यांचे कारखाने वंचित राहिले आहेत.