आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – राजाभाऊ देशमुख……
(सत्ता नसतानाही जनता माझ्यासोबतच — सुरेशकुमार जेथलिया)………………………चौकट – पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार — आमदार राजेश राठोड…….आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असली तरीही पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आमदार राजेश राठोड यांनी सांगितले……… मंठा /प्रतिनिधी : अवघ्या दीड दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी गाव आणि बूथनिहाय काम करण्याची आवश्यकता आहे.
त्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले. मंठा येथील गणेश मंगल कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवार ता. 27 रोजी पार पडली. अध्यक्षपदावरून राजाभाऊ देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश राठोड, ॲड. अन्वर देशमुख, राजेंद्र राख, नितीन जेथलिया, किसनराव मोरे, अण्णासाहेब खंदारे, निळकंठ वायाळ, बाबा गाडगे, प्राचार्य सचिन राठोड,दत्तप्रसाद बनसोडे, कयूम भाई कुरेशी, शबाब कुरेशी, मुसा भाई कुरेशी, दिलीप चव्हाण, सिराजखान पठाण यांची उपस्थिती होती. आमदार राजेश राठोड यांनी सांगितले की, परतूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी आमच्यापैकी बऱ्याच जणांनी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे, मात्र पक्षाने जो उमेदवार दिला त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असा विश्वास व्यक्त केला.
माजी.आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, मागील दहा वर्षापासून सत्ता किंवा कोणतीही संस्था आपल्या ताब्यात नसताना सुद्धा कार्यकर्ते माझ्यासोबत एकनिष्ठ राहिले आणि मी जनतेच्या संपर्कात राहिलो. महाविकास आघाडी असल्यामुळे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. परंतु ही जागा काँग्रेसला असल्यामुळे निश्चितच पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या शब्दांनुसार आपली उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांनी सांगून मी माझ्या आयुष्यामध्ये कधी मॅनेज झालो नाही आणि होणारही नाही असे सांगताना त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यांना गहीवरून आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी सुरेशकुमार जेथलिया तुम आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या प्रास्ताविकात नितीन जेथलिया यांनी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांना या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. यावेळी राजेंद्र राख, अण्णासाहेब खंदारे, रामप्रसाद जाधव, कयूम भाई कुरेशी, वसंतराव वाघमारे, योगेश अवचार, जयराम राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला माऊली वायाळ, संतोष गधे, शरद बोराडे, प्रकाश घुले, सारिकाताई वरणकर, दादाराव हिवाळे, विष्णुपंत बोराडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले.