मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेवू नये असा निर्णय सरकारने घेतला होता. यामुळे विद्यार्थी नापास होत नव्हते. आता या निर्णयात सरकारकडून बदल करण्यात आले आहेत.
नव्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीची परीक्षा होणार असून यात गुणवत्ता नसेल तर अशा विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार आहे.
विद्यार्थी नापास झाल्यास पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना अभ्यास करून पास व्हावे लागणार आहे.
इयत्ता 1 ली ते 8 वीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते. मात्र आता त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे.