मंडळ अधिकारी सुहास डोरले, अनखी किती वर्ष वरीष्ठांची दिशाभूल करायची!
येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१६ केज तालुक्यातील विडा मंडळातील मंडळ अधिकारी सुहास डोरले यांनी गेल्या तीन वर्षा पासून तत्कालीन चार तहसीलदारांची दिशाभूल करत विडा मंडळातील जीवाची वाडी गावातील जीवाची वाडी ते चारदरी दोन्ही गावांना जोडणारा नकाशावरील शासकीय रस्ता अतिक्रमण खुलं करून देण्याची मागणी गेल्या तीन वर्षा पासून ग्रामपंचायत कार्यालय जिवाचीवाडी,त्या रस्त्या लगतचे शेतकरी त्या रस्त्यालगतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व तेथील विधार्थ्यांचे पालक
यांनी गेल्या तीन वर्षापासून वेळोवेळी नियमाप्रमाणे मागणी करून ही विडा मंडळाचे मंडळ अधिकारी सुहास विलास डोरले हे रस्त्याची मागणी करणाऱ्या लोकांच्या समोरील विरुद्ध बाजूच्या शेतकऱ्यांशी संगणमत करून आर्थिक लक्ष्मीचे दर्शन घेऊन या रस्त्या लगटच्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून झुलवत ठेवलेले आहे यावर वस्ती वरील लोक यांनी मा उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई श्री.दिपक वजाळे साहेब यांची केज तहसील मध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली असता मा. उपजिल्हाधिकारी श्री.वजाळे साहेब यांनी केज तहसीलदार, सचिन देशपांडे सर यांच्या मोबाईल वरून डोरले यांना उपजिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ रस्ता खुला करण्यासाठी दोन वेळा आदेश दिले होते
याबाबत संबंधित मंडळाधिकारी यांनी दिनांक 16 रोजी संबंधित शेतकऱ्यांना स्वतःच्या स्तरावर नोटीसा काढून हजर राहणे संदर्भात तलाठी सज्जा जीवाचीवाडी उतेश्वर घुले यांच्या मार्फत कळविले आहे परंतु आज ऐनवेळी अकरा वाजता नोटीसी देऊ नये येता येत नसल्याचे भ्रह्म ध्वनी वरून डोरले यांनी कळविले आहे यापूर्वी तहसीलदार केज यांच्या मार्फत बारा वेळेस रस्ता खुल्या करण्यासाठी नोटीसा देऊन ऐनवेळी बदल केल्याने परत आजही तसेच केल्याने लोकांचा विश्वास मंडळाधिकारी डोरले वर अध्यापन राहिलेला नाही या रस्त्यालगतच्या सर्व जमीन आजही पडत आहेत त्या जमिनीचे शेतकरी मालक जमीन पडक पडल्याने आजही पोट भरण्यासाठी पुणे -मुंबई येथे स्थलांतर झालेले आहेत या रस्त्यालगतचे अनेक शेतकरी दवाखाना जाण्यासाठी रस्ता नसल्याने मृत्युमुखी पडलेले आहेत म्हणून डोरले साहेबांन विषयी लोकांचा सूर निघत आहे की आणखी किती लोक दळणवळणासाठी रस्त्या बंद असलेने मृत्यूमुखी पडू द्यायचे आहेत.
चौकट
यावर आमची प्रतिनिधीनी यांनी मा.उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई दिपक वजाळे साहेब यांच्याशी भ्रम्हध्वनी वर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आजची तारीख पुढे का ढकलली आणि यापूर्वी आपणास किती वेळेस लेखी नोटीसा देऊन कळविले याबाबतचे लेखी स्वरूपात शेतकऱ्यांनी मला कळवावे .
चौकट
आमच्या प्रतिनिधीने मंडळ अधिकारी सुहास डोरले यांच्याशी भ्रम्हध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की नायब तहसीलदार श्रीमती आशा वाघ या रजेवर असल्याने मी आजची तारीख पुढं ढकली आहे.