सेवानिवृत्तीनंतरही समाज आणि महाविद्यालयासाठी योगदान द्या – आकात
मंठा प्रतिनिधी: सेवानिवृत्ती ही फक्त नोकरी पुरती मर्यादित असते. त्यानंतरचा वेळ हा समाज आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी देऊन विद्यार्थी आणि समाज यांच्या विकासासाठी योगदान द्यावे , असे प्रतिपादन कपिल अकात यांनी केले. ते स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सेवा गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रा.भगवान ठाकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली .
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य माणिकराव थिटे व उपप्राचार्य संभाजी तिडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका प्रमुख बबनराव गणगे , डॉ . पुरुषोत्तम वायाळ ,प्रा. अशोकराव खरात , डॉ.सुधाकर जाधव , डॉ. सदाशिव कमळकर , रमेश ढवळे राधाकिसन बोराडे , डॉ.किशन गहीलोद , प्रा . पंढरीनाथ काकडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सौ . चारुलता पाटील तर आभार प्रदर्शन प्रा . राजेंद्र कादे यांनी केले . यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
फोटो ओळी – प्रा. भगवान ठाकर यांचा सत्कार करतांना कपील आकात .