लोहा
तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे विलंब न लावता तात्काळ शासनाने सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्याला मावेजा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अति वृष्टी झाली आहे
त्यामध्ये लोहा तालुक्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील हाताला आलेले सतत पावसामुळे उबळुन गेली यामुळे .शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे .या काळात सरकारने शेतकऱ्याला धिर देणे गरजेचे आहे.
शेतात तळ्यासारख्या झाले आहे सरकारने विलंब न लावता सरसकट पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ मावेजा द्यावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुका कॉंग्रेस पक्षाने मागणी केली आहे यावेळी कॉंग्रेस तालूका अध्यक्ष शरद पाटील पवार ,भास्कर पाटील जोमेगावकर, उध्दव पाटील ढेपे ,अकबर सय्यद बेरळीकर,प्रकाश मोरे,माधव पाटील ,चॉद पटेल काबेगावकर,दिंगाबर मेकाले यांची उपस्थिती होती.