Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागपूर बँक घोटाळ्यातील दोषींकडून व्याजासह 1444 कोटी वसुलीची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 5, 2024
in top news
0
नागपूर बँक घोटाळ्यातील दोषींकडून व्याजासह 1444 कोटी वसुलीची मागणी
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

* आशिष देशमुखांच्या नेतृत्वात ‘वसुली यात्रा’ काढावी – बावनकुळे

नागपूर, 5 ऑगस्ट (हिं.स.) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, सावनेरतर्फे तीन दिवस भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करून पिडीत शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे रविवारी बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.

यावेळी बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक घोटाळ्यात पिडीत शेतकरी व खातेदारांना पैसे परत मिळावेत यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे. डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या ठिय्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठींबा आहे. या बँकेत पैसा अडकल्यामुळे शेतकऱ्यांना आणि खातेदारांना भयानक त्रास सहन करावा लागला. घोटाळ्यातील पैसे वसुलीचा अधिकार असल्यामुळे सुनील केदार यांनी केलेल्या 153 कोटींच्या घोटाळ्याची रक्कम वसूल करावीच लागेल. जेएन पटेल कमिटीसमोर ज्यांचे पैसे बुडाले त्या शेतकऱ्यांचे व खातेदारांचे अर्ज गेले पाहिजेत. हे अर्ज घरोघरी जाऊन गोळा करा.

हे सर्व अर्ज घेण्याकरिता संविधान चौकात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणल्याशिवाय राहणार नाही. हे अर्ज सरकारसाठी असणार आहेत. पूर्ण नागपूर जिल्ह्यात फिरून आणि ‘वसुली यात्रा’ काढून अर्ज जमा करण्याचा अभिनंदनीय निर्णय घेण्यात आला आहे. हे अर्ज घेऊन डॉ. आशिष देशमुख हे संविधान चौकात जेव्हा उपस्थित राहतील तेव्हा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथे हे अर्ज घेण्यासाठी बोलावेन. त्यासाठी पक्षाला व देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की, हे शेतकऱ्यांचे अर्ज घेतले पाहिजेत आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. ज्या लोकांचे अर्ज येतील त्या सर्वांसाठी सरकारच्या माध्यमातून वसुली झाली पाहिजे. या वसुलीकरिता लढावे लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता ही लढाई सुरु होईल. डॉ. आशिष देशमुख यांनी ही ‘वसुली यात्रा’ तातडीने काढावी.

डॉ. आशिष देशमुख सुरुवातीला आपल्या भाषणात म्हणाले, मागील 22 वर्षात कित्येक पिडीत शेतकरी, खातेदार बर्बाद झाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पगाराचे पैसे नोकरदार वर्गाला मिळाले नाहीत. कित्येक मुलींचे लग्न मोडल्या गेले. सुनील केदारांनी लोकांचे पैसे लुटले. त्यांच्या दहशतीमुळे लोकं बोलत नाहीत. ग्रामीण भागाला चालना देणाऱ्या जिल्हा परिषदेचे पैसे सुद्धा यात अडकले. सोसायट्या, संस्था अडकल्या. न्यायालयाने सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा केली. 11 वर्षे ते निवडणूक लढू शकत नाहीत. सहकार कायद्यांतर्गत 1444 कोटी रुपयांची वसुली झाली पाहिजे. व्याजासकट पैसे पिडीत शेतकरी व खातेदारांना मिळाले पाहिजे. सहकारमंत्री श्री दिलीप वळसे पाटील वसुली करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत कारण त्यांचे केदारांशी हितसंबंध आहेत. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी यात लक्ष घालून पीडितांना न्याय देण्याची गरज आहे.

परंतु, वळसे पाटील हे अजितदादांचे ऐकत नसून शरद पवारांचे ऐकत आहेत. वळसे पाटील यांनी सावनेरमध्ये यावे. तांत्रिक अडचणी दूर करून त्यांनी केदारांकडून वसुली सुरु करावी. या वसुलीच्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही. सुनील केदार यांना जनतेने गावबंदी करावी, त्यांना पैश्याबद्दल विचारणा करावी. जनतेने सावनेर विधानसभा क्षेत्रात भ्रष्टाचारी आमदार बदलून परिवर्तन करावे. कारण त्यांनी लोकांचे भविष्य खराब केले, दोन पिढ्या गारद केल्या. आम्ही शांत बसणार नाही. ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर आमरण उपोषण तसेच संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ‘वसुली यात्रा’ काढल्याशिवाय राहणार नाही. सुनील केदार यांच्याकडून 1444 कोटींची वसुली करून ते 2 महिन्यात पिडीत शेतकरी, नोकरदार व खातेदारांच्या खात्यात पैसे जमा करा, ही आमची मागणी आहे. ही वरपर्यंत न्यावी, अशी मागणी मी चंद्रशेखर बावनकुळे यांना करतो.

Post Views: 14
Previous Post

कारागृहात कैद्यांना बराकीत प्रवेशासाठी आता बायोमेट्रिक अनिवार्य

Next Post

बीड येथील लोक कलावंताच्या मेळाव्यात पारगाव येथील शाहीर अशोक जाधव यांनी केलेल्या मागण्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बीड येथील लोक कलावंताच्या मेळाव्यात पारगाव येथील शाहीर अशोक जाधव यांनी केलेल्या मागण्या

बीड येथील लोक कलावंताच्या मेळाव्यात पारगाव येथील शाहीर अशोक जाधव यांनी केलेल्या मागण्या

ताज्या बातम्या

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग ! राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार ! #public

February 11, 2026

काकांचा घातपातच: रोहित पवार..#ajitpawar #rohitpawar #politics #solapur #news

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0675148

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697