भोकर(प्रतिनिधी)बांग्ला देशातील हिंदु समाजावर होत असलेला अत्याचार व मंदिरावरील हल्ले त्वरित थांबवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलून अल्पसंख्याक हिंदू ना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
भारता शेजारील बांगला देशात सत्ता परिवर्तन आंदोलनाच्या आड अल्पसंख्याक हिंदु समाजाला बहुसंख्य समाजाकडून लक्ष करण्यात येत आहे. हिंदु समाजावर अमानवी अत्याचार करुन जीवे मारण्यात येत असुन मंदिराची तोडफोड करण्यात येत आहे. याबाबत भारत सरकारने कठोर भुमिका स्विकारुन उपाययोजना करत हिंदुच्या जीवीत्वाची व संपत्तीची रक्षा करण्यासाठी पावूल उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच भारतात वास्तव्यात असलेल्या रोहिंग्या मुसलमान व इतर घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू करावी
याकामी भारतीय नागरिक खंबीरपणे सरकारच्या पाठीशी उभी असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदन भोकर तहसीलदार यांच्या मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,गृहमंत्रालय कार्यालय, नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे.यावेळी संतोष मारकवाड, प्रकाश मामा कोंडलवार,बाळा साकळकर,प्रशांत पोपशेटवार,हरीभाऊ चाटलावार,माऊली पाटील,माधव शिंदे,शिवा जाधव,सुनील शहा, श्रीकांत किन्हाळकर आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.