डॉ.राहुल कांबळे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित ..!
मुखेड प्रतिनीधी / ॲड. रणजित जामखेडकर
मागील दहा – बारा वर्षापासून अविरतपणे सामाजिक क्षेत्रात व पशुवैद्यकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावणारे अनुसूचित जाती जमाती शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी मंत्रालयीन संघटना पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र राज्य चे राज्य अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्कार प्राप्त डॉ.राहुल तुळशीराम कांबळे येवतीकर यांना नुकताच दि.२१ जुलै २०२४ रोजी टोलोसो युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको या विदेशातील विद्यापीठ संलग्नित तेलंगणा राज्यातील जहिराबाद जि.संगारेड्डी येथील डॉक्टर “पदवी प्रदान” समारंभ पार पडला.
या समारंभा दरम्यान डॉ.राहुल कांबळे यांना त्यांच्या विशिष्ट सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानाची “मानद डॉक्टरेट पदवी डॉ.व्ही.कट्टाबोमन- कंट्री डायरेक्टर युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा – मेक्सिको,डॉ.के कुमार, जिल्हाधिकारी, डॉ.किरण कुमार तहसीलदार, मा.प्रकाश सुर्यवंशी, सहाय्यक संचालक डिआयसी कार्यालय बिदर, डॉ.रेड्डी व्हेटर्नरी कॉलेज बिदर यांच्यासह वसंत गायकवाड- प्राचार्य जहीराबाद, रमेश बिगावकर कॉर्नेटर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
डॉ.राहुल कांबळे यांचे सामाजिक कार्य व पशू सेवा कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.त्यांनी त्यांच्या पशू सेवेमध्ये अद्यापपर्यंत अनंत गायी,म्हशी यांना जीवदान देण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ.कांबळे यांनी केलेले आहे. त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात देखील महापुरुषांच्या जयंती निमित्त १८ तास अभ्यास उपक्रम, विविध उपक्रम वृक्षारोपण,पशू शिबीरे राबविणे असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले आहेत.डॉ.राहुल कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे उराशी बाळगून त्यांना शिक्षण घेतले अतिशय संघर्षमय जीवनातून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
बालपणापासूनच डॉ.राहुल कांबळे हे बुद्ध शिव, फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांशी जुळवून असल्यामुळे त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला.त्यामुळे ते अद्यापपर्यंत त्यांच्या आयुष्य कुठेही डगमगले नाही अनेक संकट आले अनेक समस्यांचा संघर्ष करावा लागला.ते कुठेही न खस्ता आपल्या आयुष्याचा संघर्ष ते करतच राहिले आणि करतच आहेत.त्यांच्या या उतुंग यशाच्या शिखरावर चढताना त्यांना त्यांच्या अर्धांगिनी आयु.सोनाली राहुल कांबळे यांची खुप मोलाची साथ मिळाली व परिवारातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाल अशाच त्यांना २०२२ चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्कार नवी दिल्ली येथे भेटला.
त्यांचें सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय असून त्यांना ही सन्मानाची “मानद डॉक्टरेट पदवी” पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांना “मानद डॉक्टरेट पदवी” पुरस्कार बहाल करण्यात आल्याबद्दल मुखेड – कंधार विधानसभेचे आमदार डॉ. तुषार राठोड, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते दशरथरावजी लोहबंदे, रिपाइंचे चे जिल्हाध्यक्ष गौतम काळे, पँथर बाबुराव कांबळे येवतीकर , माजी सैनिक तुळशीराम कांबळे, गौशआल्ली शेख राजकिय, सामाजिक, क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी मित्र मंडळी व पत्रकार बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील कार्यास सदिच्छा देत आहेत.