जाफ्राबाद प्रतिनिधी
आज जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खिल्लारे साहेब यांची भेट घेऊन जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना सिंचन विहीर व जनावरांचा गोठा तात्काळ द्या अशी मागणी करत निवेदन दिले.महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीने सिंचन विहिरी शेतकऱ्यांना दिल्या परंतु जालना जिल्ह्यातील जाफराबाद व भोकरदन या दोन तालुक्यात एकही विहीर शेतकऱ्यांना दिली नाही जाफ्राबाद भोकरदन तालुके का पाकिस्तानात येतात का असा असा संतप्त सवाल यावेळी मयुर बोर्डे यानी पंचायत समिती प्रशासनास यावेळी त्यानी केला .
गेल्या पाच वर्षांत सरकारच्या या योजनेचा बोजवार दोन्ही तालुक्यातील बी डी ओ ने केला.प्रस्ताव दाखल असताना सिंचन विहिरी का दिल्या नाहीत याचा खुलासा द्यावा अशी मागणी मयुर बोर्डे यानी केली.सरकार म्हणजे नुसता घोषणांचा बाजार आहे असे देखील या वेळी ते म्हणाले.तात्काळ सिंचन विहिरी व जनावरांचा गोठा शेतकऱ्यांना दिल्या नाही तर पंचायत समिती कार्यालय ताब्यात घेऊ असा इशारा मयुर बोर्डे यांनी प्रशासनाला दिला.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे,तालुका संपर्क प्रमुख प्रदीप नरवाडे, तालुका उपाध्यक्ष गजानन भोपळे,भीमराव राऊत, आरिफ शहा नंदकिशोर इंगळे, अंकुश इंगळे,शरद तेलग्रे, अनिल नरवाडे इत्यादिसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते.
जाफ्राबाद भोकरदन तालुके का पाकिस्तानमध्ये येते का अख्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विहिरी मिळाले मग जाफ्राबाद भोकरदन तालुके का वगळण्यात आले शेतकऱ्यांना सिंचन विहीर व जनावरांचे गोठ्यांचा प्रश्न मार्गी नाही लावला तर दोन्ही तालुक्यातील शेतकरी घेऊन पंचायत समितीत ताब्यात घेणार
मयुर बोर्डे