मुखेड / प्रतिनिधी :- ऍड. रणजित जामखेडकर
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात परीक्षा विभागाच्या वतीने पदवीदान संमारंभ घेण्यात आला . पदवीदान समारंभात बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.काँमचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख पाहुणे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य हणमंतराव मस्कले , मराठी विभागाचे से.नि.प्रा.सी.बी.साखरे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , व्यासपीठावर परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.के.राऊत , सहाय्यक प्रा.एस.एम.देवशेट्टे हे उपस्थित होते . प्रास्ताविक प्रा.डॉ. एम.के.राऊत , सूत्रसंचालन प्रा.डॉ. पी.ए.जोशी , प्रा.डॉ.व्ही.जी.वारकड , प्रा.डॉ. डी.के. आहेर तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. के.बी.हातोडे यांनी केले .
मान्यवरांच्या हस्ते सर्वांना पदवी बहाल करण्यात आली . पदवीधर विद्यार्थ्यांपैकी तिरुपती कांबळे , सतीश खोचरे , कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले . प्रमुख पाहुणे मस्कले यांनी आपल्या भाषणात पदवी प्राप्त केल्यानंतर आयुष्यातील उतार – चढाव यावर कसे मात करावे हे शिकावे . सामाजिक जबाबदारी ओळखून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे मार्गदर्शन केले . माजी प्रा.साखरे यांनी शिक्षणाचे महत्त्व , आई – वडील , गुरुजनाचे ज्ञान , जिद्द , मेहनतीने यशस्वी होऊन पदवी मिळवल्यावर स्वप्नपूर्तीसाठी धडपडताना मिळणाऱ्या हजारो वाटा उपलब्ध आहेत . या महाविद्यालयातून मिळालेले शिक्षण वाया जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे .
देशाच्या विकासात योगदान देताना होईल तितके चांगले काम करावे . आपल्या हातातून चांगले होत नसेल तर देश विघातक कार्य करु नये असा मोलाचा सल्ला दिला .अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अडकिणे यांनी पदवी म्हणजे केवळ शिक्षण नसून सामाजिक जबाबदारी आहे . स्पर्धेत गळेकापू स्पर्धा आहे . रिक्त जागा भरताना बेरोजगार युवकांची अमर्याद संख्या आहे . अपयश ही यशाची पायरी आहे . सर्व पदवीधारकांचे अभिनंदन केले .
महाविद्यालयाच्या निर्मिती मागील उद्देश विविध क्षेत्रातील गुणवंताच्या यशावर अवलंबून आहे . पदवी ही फक्त तीन वर्षाचे शिक्षण नसून आयुष्यभराची मिळालेली शिदोरी आहे . विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सदैव प्रयत्न करावे असे विचार मांडले . शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये परीक्षा यशस्वी घेण्यासाठी प्रा.डॉ. विनोद कोटीवाले , तांत्रिक साहाय्य श्रीराम पताळे , दिनानाथ नालापल्ले , गजानन पोलावार यांनी परिश्रम घेतले . यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व पदवीधारकांची उपस्थिती होती .