*बदनापूर तालुक्यातील अंबडगाव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद*
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा- माजी आमदार संतोष सांबरे यांची निवेदनाद्वारे मागणी
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड बदनापूर 3 सप्टेंबर तालुक्यातील अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेना सचिव संजय लाखे पाटील, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, मा. जि प अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर,
शिवसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, हनुमान धांडे, रमेश गव्हाड, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, राजेश जराड जि प सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस यांची उपस्थिती होती
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते त्याचबरोबर शेती पिकांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे काही ठिकाणी रस्त्यावरील पुले वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे
जालना जिल्ह्यात सरासरी 107.3 मि मी पाऊस झाला असून जिल्ह्यातील 29 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, तुर तसेच मोसंबी डाळिंब द्राक्ष यांसारख्या अनेक पिकांचे व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला आणि त्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता अंबडगाव ता बदनापूर येथील गावकऱ्यांच्या वतीने सरपंच राजेश जऱ्हाड, श्रीरंगराव जऱ्हाड यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नुकसानीबाबत व्यथा मांडल्या.
यामध्ये पीकविमा व ई पीक पाहणी ऍप बद्द्ल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असल्याचे सांगितले तसेच नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असला तरीही क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये नुकसानाची माहिती फोटो अपलोड करण्याबाबत कृषी विभागाकडून कळविण्यात आलेले आहे
परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने या ॲपचा वापर करता येत नाही. तसेच नेटवर्किंग समस्येमुळे 24 तास उलटले तरीही माहिती अपलोड होत नाही. त्याचबरोबर कुठे सर्वर चालत नाही तर कुठे माहिती अपलोड होत नाही तर कुठे जीपीएस ट्रॅक होत नाही तर काही वेळेस त्या गट नंबर मध्ये उभा असताना देखील हे ॲप चुकीची माहिती दाखवत आहे त्यामुळे नुकसानीची माहिती ॲपवर अपलोड कशी करायची हा शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या कारणाने अनेक शेतकरी पिक विमा भरून देखील या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे,
त्याकरिता शासनाने ऑनलाइन तक्रारीची अट रद्द करून नुकसान झालेल्या शेतपिकांचे व फळ पिकांचे तातडीने शासन स्तरावरून सरसकट पंचनामे करण्यात यावे. आंबिया बहराची मोसंबी ची मोठ्या प्रमाणात फळगळ होत असून ही फळगळ रोखण्यासाठी शेतकरी हवालदैल झालेला आहे मोसंबी फळावर पाण्यामुळे बुरशी येऊन मुंगू रोगाची तसेच मगरी रोगाची लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने फळबाग धारक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिलेले आहे. त्याचबरोबर पाण्यात वाहून गेलेल्या पशुधनाचे देखील पंचनामे करावेत, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करणे, वीज पडून नुकसान झालेल्या ठिकाणीचे पंचनामे करणे, छोट्या व मोठ्या फुटलेल्या तलावांचे पंचनामे करून दुरुस्ती करण्यात यावी, पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्यात यावे,
त्याबरोबर पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्यांचे व पुलांचे पंचनामे करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे पडलेले व मोडलेले विद्युत पोल उभे करून विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्या. आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून तुम्ही खचून जाऊ नका शिवसेना तुमच्या पाठीशी असुन आपण हिमतीने या अस्मानी संकटाचा सामना करावा अशा शब्दांत दिलासा दिला.
त्याचबरोबर तहसीलदार बदनापूर, गटविकास अधिकारी बदनापूर व कृषी अधिकारी बदनापूर यांना तातडीने पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या व शासन स्तरावरून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीची मदत मिळण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी देवजी नाना जऱ्हाड ,हरिहर शिंदे, युवा सेना विस्तारक भरत सांबरे, दिनेश काकडे, राम लांडे, राजेंद्र जऱ्हाड, जगन दुर्गे, नंदू पुंड, युवा सेना तालुकाप्रमुख भरत मदन, श्रीराम कान्हेरे, कृष्णा खंडेकर, संजय जाधव, परमेश्वर म्हात्रे, राजेंद्र गव्हाड, रामेश्वर फंड, कल्याण टकले, राम शिरसाट, सिद्धेश्वर उबाळे, मुकुंद हुसे, शैलेश दिवटे, बंडू पागिरे, राहुल जराड, सुनील बनकर, सुशीलकुमार रुपवते, दत्तू ननवरे, बाळासाहेब नारळे, अनिस पठाण, बापूराव गांडुळे, अशोक कदम, सुरेश घोरपडे, विठ्ठल खैरे,
लिंबाजी क्षीरसागर, अंकुश वाघ, अंकुश पवार, पीडी मदन, सोमनाथ मदन, संभाजी मदन, गजानन बोंद्रे, कृष्णा कोल्हे, ऋषी थोरात, सुदाम काळे, आसिफ पटेल, अलीम पठाण, संतोष खरात, लक्ष्मण साळवे, शरद महेर, साजिद पटेल, सुभाष आरसूळ, दत्ता जगताप अरुण पैठणे, इलिया कांबळे, कृष्णा ओळेकर, गजानन वाळके, विजय जाधव, शिवराज जऱ्हाड, शेख, मोहम्मद, रिजवान पठाण, गणेश पांगरे, खंडेराव जऱ्हाड, वेदांत जऱ्हाड, जगन्नाथ जऱ्हाड, परमेश्वर जऱ्हाड, निवृत्ती जऱ्हाड, भास्कर जऱ्हाड, नबाजी जऱ्हाड, किशोर एखंडे यांच्यासह शेतकरी, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,