Wednesday, July 2, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था – डॉ जितेंद्र सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 11, 2024
in india
0
भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था – डॉ जितेंद्र सिंह

The Minister of State (Independent Charge) for Science & Technology, Prime Minister?s Office, Personnel, Public Grievances & Pensions, Atomic Energy and Space, Dr. Jitendra Singh addressing a press conference on Nine Year Achievements of Ministry of Personnel, Public Grievances and Pensions, in New Delhi on June 09, 2023.

0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आपण 2014 मध्ये 81 व्या क्रमांकावर होतो, आपण 41 स्थानांनी झेप घेतली असून आज आपण जगात 40 व्या क्रमांकावर आहोत. भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे आणि इथे सर्वांत वेगाने वाढणारे युनिकॉर्न आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

नवी दिल्लीत टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ‘द बिग शिफ्ट – मेजरिंग द फोर्सेस ऑफ चेंज’ या जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करत होते. 2014 मध्ये भारतात केवळ 350 स्टार्टअप्स होते. आज त्यात 300 पटीने वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया’ अशी घोषणा दिल्यानंतर आणि 2016 मध्ये विशेष स्टार्टअप योजना आणल्यानंतर, आज आपल्याकडे 1,30,000 स्टार्टअप्स आहेत आणि 110 हून अधिक युनिकॉर्न आहेत,” असे ते म्हणाले.

“नाजूक 5” ते “अव्वल 5” अर्थव्यवस्थेपर्यंतचा गेल्या दहा वर्षांचा भारताचा हा प्रवास एक संशोधनाचा विषय आहे, जो अर्थशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आकर्षित आणि उत्साही करेल. भूतकाळातील उपहासवृत्ती आणि घोटाळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील दशक हे संदिग्ध वेगळेपण जाणून घेण्याची संधी असून निराशावादाकडून आशावादाकडे प्रवासाची ही सुरुवात आहे, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत भारताने विविध जागतिक मापदंड आणि सार्वत्रिक मानकांमध्ये वेगाने वाढ केली आहे. देशात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती, मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षम वातावरण तयार झाले, असे सिंह म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे भारताचे अंतराळ क्षेत्र खुले झाल्यामुळे , सामान्य जनतेला चांद्रयान-3 आणि आदित्य सारख्या प्रमुख अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होता आले. चार-पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे अंतराळ क्षेत्रात फक्त एक स्टार्टअप होता, आज हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे सुमारे 190 खाजगी स्पेस स्टार्टअप्स आहेत तर याआधीचे स्टार्टअप आता उद्योजक बनले आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत खाजगी स्पेस स्टार्टअप्सनी 1,000 कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे असे ते म्हणाले.

आपला अंतराळ संशोधन कार्यक्रम 1969 साली सुरू झाला , ज्या वर्षी अमेरिकेने चंद्रावर प्रथमच मानवाला उतरवले होते. मात्र त्यानंतर आपण अंतराळ क्षेत्रातील प्रमुख राष्ट्रांच्या बरोबरीने आपली कामगिरी उंचावली. आणि गेल्या वर्षी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अलगदपणे उतरून इतिहास घडवला , जेथे यापूर्वी कोणीही उतरले नाही.

भारताच्या भविष्यातील आर्थिक वाढीला जैवतंत्रज्ञान चालना देईल असे सांगत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, सध्या आपल्या जैव-अर्थव्यवस्थेचे मूल्य जवळपास 140 अब्ज डॉलर्स आहे जे एक दशकापूर्वी 10 अब्ज डॉलर्स होते. आज देशात 6,300 पेक्षा जास्त बायोटेक स्टार्टअप्स आणि 3,000 हून अधिक ॲग्रीटेक स्टार्टअप आहेत असे ते म्हणाले.

“आपल्याकडे भारतात विपुल जैव संसाधने आहेत, – हिमालयात, वनौषधी, अरोमा मिशन नवीन संधी निर्माण करत आहे तर 7,500 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या किनारपट्टीवर समुद्रातील प्रचंड संपत्तीचा वापर करण्यासाठी डीप ओशन मिशन सुरू करण्यात आले आहे,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

“अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन” वैज्ञानिक संशोधनात मोठ्या सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचा मार्ग मोकळा करेल असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की एनआरएफ हे अमेरिकेच्या एनआरएफपेक्षा चांगले मॉडेल असेल.

“एनआरएफ तरतुदीत पाच वर्षांत 50,000 कोटी रुपये निधी उभा राहील अशी अपेक्षा आहे , त्यापैकी सुमारे 60%-70%, बिगर -सरकारी स्त्रोतांकडून येण्याचा अंदाज आहे,” असे ते म्हणाले.

एककेंद्रीपणाचा काळ आता संपला आहे याचा पुनरुच्चार करत, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, एनआरएफ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील एकात्मतेला चालना देईल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 च्या शिफारशींनुसार देशात वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करेल.

नवोन्मेषक, संशोधन आणि विकास आणि स्टार्टअपसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग्य परिसंस्था दिली आहे जी नवोन्मेषाला पूरक आहे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि उद्योगाच्या भरभराटीला अनुकूल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील आपण स्वत:हून लादलेल्या बेड्यांपासून आपली सुटका केल्याचा उल्लेख करून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकारने सुमारे 2,000 जुने कायदे रद्द केले आणि अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त केली, जे पूर्वी थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि वाढीला चालना देण्यासाठी हानिकारक ठरले होते.

आज जग भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे, असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, हरित ऊर्जा आणि शून्य उत्सर्जन आणि गेल्या वर्षी जी 20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन आघाडी सुरु करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे आपण हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाला अधिक बळ देत आहोत.

जग आज भारताकडे नेतृत्वाच्या आशेने पाहत आहे असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, आजचे युवक हे पंतप्रधान मोदींच्या “विकसित भारत” @2047चे शिल्पकार असतील.

Previous Post

तृणधान्य नियमित आहारात, आरोग्य नांदेल घराघरात

Next Post

धामणगाव तालुक्यात गारपीट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
धामणगाव तालुक्यात गारपीट

धामणगाव तालुक्यात गारपीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group