प्रतिनिधी–सुशीलकुमार पाटील,खामसवाडी,ता.कळंब,
खामसवाडी,दि.25 – -सुरक्षित प्रवास सुलभ प्रवास,प्रत्येक प्रवाशी प्रवासाची हमी अशी आपल्या लाडक्या लालपरीच ब्रीद.पण सद्यस्थितीत सुरक्षित प्रवासाची हमी आहे का.?प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित असणारी लालपरी सुरक्षित आहे का असा ज्वलंत प्रश्न समोर आला आहे. कळंब आगारच्या एसटी बसेस पुर्णपणे खिळखिळ्या झालेल्या आहेत. प्रचंड धुर ओकत एसटी बसेस रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. कधी कुठे गाड्या बंद पडतील याचाही भरवसा नाही..?
त्यातच भर पावसात यासर्व एसटी बसेस चक्क गळतात..! मोठ्या पाऊसात एसटीच्यामध्ये छत्र्या उघडव्या लागतात यावरून कळंब आगाराचे स्वरूपाचे दर्शन सर्वांना घडतआहे. कळंब-धाराशिव ढोकीमार्गे दर अर्ध्या तासाला गाड्या आहेत त्याबरोबरच कळंब-मुंबई,कळंब-हैदराबाद, कळंब-पुणे,कळंब-सोलापूर या लांबपल्ल्यच्याही एसटी बसेस आहेत. दर अर्ध्या तासाला कळंब-धाराशिव ढोकीमार्गे गाड्या धावतात. कळंब धाराशिव मोहा,खामसवाडी,तडवळा, येडशी,येरमाळा, आदी ग्रामीण भागात लालपरीचीच्या फेऱ्या होतात.आज घडीला कळंब आगराच्या एसटी बसने हजारो प्रवाशी प्रवास करतात.शाळेत,कॉलेज तेवढेच विद्यार्थी यामुळे सर्वांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कळंब आगारात सद्यस्थितीत एकूण 84 एसटी बसेस आहेत यापैकी सर्वच गाड्या खिळखिळ्या, इंजिन बिघाड,पाऊसात गळक्या अशा अवस्थेत आहेत. लालपरीचे चालक-वाहक नावीलाजने आपले कर्तव्य पार पाडत आहेत.त्यांची अवस्था ही तोंड दाबुन बुक्क्याचा मार अशी आहे. त्यांच्याच वेतणासाठी त्यांना आंदोलन करावे लागले होते यातच डबड्या गाडीची व्यथा कोणाला सांगावी अशी अवस्था त्यांची आहे.जिव मुठीत घेऊन चालक-वाहक लालपरी चालवीत आहेत मात्र प्रवाशांची जोखीम कोण घेणार हे विशेषच..!