तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे )- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते.त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन येरमाळा परिसरातील मराठा समाजाच्या वतीने तलाठी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला मोर्चा संदर्भात मराठा कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते.
मराठा आरक्षणा संदर्भात गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकारने तेरा जुलै तारखेपर्यंत मुदत द्या निर्णय घेऊ म्हणून उपोषण सोडले मात्र तेरा तारखेला कांहीच निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडयातील अनेक जिल्ह्यात मराठा शांतता रॅली काढल्या आणि १८ जुलैला पुन्हा अंतरावली सराठी उपोषण सुरु केले होते.या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक भागातून विविध आंदोलने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती.
आज बुधवारी येरमाळा येथील आठवडी बाजार दिवशीच येरमाळ्यासह परिसरातील गावांनी उपोषणाला पाठिंबा म्हणुन येरमाळा तलाठी कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चाला परिसरातील दहा बारा गावातुन पन्नास बैलगाड्या सह शेकडो मराठा आंदोलक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाणंपूलापासुन,गावातील मुख्य रस्त्यावरुन तलाठी कार्याल्यावर बैल गाडीमोर्चा नेण्यात आला.या वेळी मोर्च्यात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालच पाहिजे,एक मराठा लाख मराठा,लडेंगे या मरेंगे हम सब जरांगे,तुमचं आमचं नातं काय,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
मोर्चा तलाठी कार्यालयावर आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या हस्ते नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे देण्यात आले.सकाळी ११ वा.बैलगाडी मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषना च्या आज पाचव्या दिवशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना सलाईन सुरु होते.सलाईनवर उपोषण करण्यापेक्षा पुढील आंदोलनाची दिशा ठरवू म्हणतं उपोषण मागे घेतल्याची माहिती मिळाली तरी बैलगाडी मोर्चा दिल्या प्रमाणे काढण्यात आला.