मंठा पोलिसांनी केला 48 तासात खुनाचा उलगडा
जालना प्रतिनिधी : तालुक्यातील पाटोदा येथे (ता.15 ) सोमवार रोजी तुकाराम आबासाहेब श्रावणे हा 19 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार मंठा पोलीस ठाण्यात नातेवाईकाकडुन देण्यात आली होती. याप्रकरणी मंठा पोलिसांनी या तरुणाच्या बेपत्ता प्रकरणी सखोल चौकशी करून खुणाच्या गुन्ह्याचा उलगडा 48 तासात केला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार , मंठा तालुक्यातील पाटोदा येथे 19 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकाकडून पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस पथकाकडून तपासाची चक्री फिरवत याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशीअंती सदरील तरुणाची विडोळी शिवारातील उसाच्या शेतात हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले.
याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयिता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध घेतला. या घटनेतील संशयित धनंजय राजेभाऊ गुंजकर , आवेस शेख, मोहसीन शहा, रोहन वैराळे, अर्जुन शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक आरोपीस शेळगाव ता.परांडा जिल्हा उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले असुन याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल , अप्पर पोलीस अधिक्षक आयुषजी नोपाणी , उपविभागीय पोलीस अधिकारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रविंद्र निकाळजे, सपोनी भारती, पोउपनि कैलास भारती , फौजदार बलभीम राऊत, पोलीस अंमलदार जगन्नाथ सुक्रे, शाम गायके, सुनिल होंडे, मांगीलाल राठोड, मनोज काळे, पांडुरंग निबाळकर, संतोष बनकर, मुंजाजी कोलगणे, श्रीकांत काळे, आसाराम मदने, राजु राठोड, आकाश राऊत यांनी केली.