दोदडगाव येथून निघणार ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा
यात्रेचा पहिला टप्पा
ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील मंडल स्तंभापासून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सोमवार पासून। (दि.२२) सुरुवात होणार आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा शेवट परभणी मध्ये होणार आहे.
आरक्षणाचा लोगो
ही यात्रा मुक्काम दर मुक्काम करत ग्रामीण भागात जंगी सभा होणार आहेत. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधवानी समाविष्ट व्हावे, असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले आहे. जालना येथील होटेल अथर्व येथे ओबीसी समाज बांधवाची बैठक शनिवारी झाली. यानंतर वाघमारे यांनी पत्रकार परिषद
घेतली. यावेळी ओबीसी नेते अशोक पांगारकर, बळीराम खटके, राम लांडे, सत्संग मुंडे तुकाराम वायाळ, रामप्रसाद अभिजीत खटके अनुज चपटे थोरात आदी उपस्थित होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा निघणार आहे. दोदडगाव येथून ही यात्रा निघणार असून बीडसह विविध जिल्ह्यातून जाणार आहे. समारोप २६ जुलै रोजी परभणी येथे होणार
लेखी हमी द्यावी चौकट
■ मनोज जरांगे याना संविधान व मंडल आयोगाचा अभ्यास नाही ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असे म्हणतात. मुख्यमंत्री यांनी आम्हाला लेखी हमी द्यावी. आजपर्यंत ५७ लाख कुणबी प्रमाणपत्र सरकारने केले असून बोगस प्रमाणपत्रांची तपासणी करावी. राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेते मंडळी मागील दहा महिन्यापासून जरांगे याचे लाड करत आहे. जरांगेच्या हट्टापायी ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही असे नवनाथ वाघमारे म्हणाले.
ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ पाडू, असे जरांगे म्हणतात.
त्यांच्या या भुमिकेचे स्वागत आहे. २८८ जणांना पाडले तर नवख्यांना संधी मिळणार आहे. असेही वाघमारे म्हणाले.