.करकंब प्रतिनिधी:-करकंब येथे पालख्यांच्या आगमनानिमित्ताने स्वागतासाठी साक्षरता दिंडीचे आयोजन जि.प.सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, माध्यमिक योजनाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या साक्षरता दिंडीचे उदघाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरचे जेष्ठ अधिव्याख्याता अरुण जाधव यांच्या हस्ते तर दिंडीचे स्वागत करकंब उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी केले.
या दिंडीत रामभाऊ जोशी हायस्कूल,न्यू इंग्लिश स्कूल,जि. प. केंद्र शाळा मुले नं.१,जि.प.प्राथ. शाळा मुले नं. २जि.प.प्राथ शाळा मुली नं २ या शाळांतील विद्यार्थांनी सहभाग घेतला.याप्रसंगी विद्यार्थ्याकडून संतांच्या नावांच्या व शैक्षणिक घोषणा देण्यात आल्या.स्काऊट गाईडमधील आणि वारकरी वेषातील मुलांमुळे ही दिंडी आकर्षक दिसत होती.या साक्षरता दिंडीस पंढरपूर गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, करकंब केंद्रप्रमुख लहू कांबळे,प्राचार्य हेमंत कदम,मा.केंद्रप्रमुख करकंब, आदर्श शिक्षक रविकिरण वेळापूरकर, यांचे मार्गदर्शन लाभले.
या साक्षरता दिंडीत रामभाऊ जोशी हायस्कूलचे पर्यवेक्षक धनवंत करळे, स्काऊट मास्टर महादेव पुजारी,संजय पंचवाडकर,कलाशिक्षक ज्ञानेश्वर कुंभार,शुकूर बागवान,मनिषा ढोबळे, अश्विनी शिंगटे,न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता करमाळकर, देवकते सर,माळी सर,शंकर गायकवाड,प्रशांत वेळापूरकर सर,केंद्रीय मुख्याध्यापक शेख,शबाना मुलाणी,रविकिरण वेळापूरकर,मुख्यापक दत्तात्रय खंदारे, महामुनी मॅडम,विद्यार्थी, विद्यार्थीनी, जि.प.मा.अध्यक्ष बाबूराव जाधव,नामदेव चेडे,पत्रकार मनोज पवार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.