परतूर प्रतिनिधी :-
परतूर ची नगर पालिका कायम वाईट कामकाजामुळे चर्चेत असते. सद्या शहराचा कारभार हा आंधळ्या प्रशासनाच्या हातात आहे. सामान्य नागरिकांना पालिकेतून एखादा कागद मिळावायचा असल्यास चिरीमिरी दिल्याशिवाय काम होतं नाहीत. अशा अनेक तक्रारी करूनही कामकाजात काडीचा फरक पडत नाही. विकासाच्या बाबतीत तर अधिकारी हे नेहमी झोपेत असतात.
शहरातील अनेकांनी पवाळ्यापूर्वी कामे पूर्ण करा म्हणून निवेदने दिली, आंदोलणे करण्याचे इशारे दिले परंतु गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जनतेच्या प्रश्नाचे काहीएक देणेघेणे नाही हे दिसून येते.
शहरात हालकसा जरी पाऊस पडला तरी नाल्या जाम होतात. डवने जशे बाहेर पडतात तसे नाल्याचे पाणी हे कुठूनही बाहेर पडते यामुळे रोडवर पाणीच पाणी साचते. पादचारी असो की मोटारसायकल किंवा चारचाकी गाड्या असो. कधी कोणत्या खड्यात जातील याचा भरवसा नाही. प्रशासनाला अशा घेटनेची कल्पना असूनही अधिकारी काना डोळा करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. शहरात अनेक नाल्यावर ढापे नाहीत म्हणून पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येते नाही पर्यायाने वाहचालक व पादचारी खड्यात पडतात.
भारतीय स्टेट बँक ही कायम वर्दळीचे ठिकाण आहे. या बँकेसमोर नाला असून गेट च्या लगटच नाली चा ढापा उघडा असल्यामुळे अनेकदा यामध्ये ग्राहकांच्या गाड्या पडलेल्या आहेत. यामुळे ग्राहक किरकोळ जखमीही झालेले आहेत. कालशहरात दुपारी दिड ते दोन च्या सुमारास हालकसा पाऊस पडला यामुळे नाल्याचे पाणी शहरात अनेक ठिकाणी रोडवर आलेले होते. बँकेच्या समोर अर्ध्या रोड सह गेट जवळ पाणी साचलेले होते. भाऊसाहेब देविदासराव मुके हे बँकेतील काम आटोपून बाहेर आले स्कुटी वळून घेऊन जात असतांना पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने स्कुटी सह खोल नालीत कंबरा एवढे डूबले होते. त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचा हात नालीच्या कडेला टेकला त्यामुळे डोकं वाचले व तेही नालीत पूर्ण डूबले नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
आज मी मारता मारता वाचलो असे म्हणावे लागेल. पालिका प्रशासनाने आता तरी शहरातील जाम झालेल्या नाल्यांची साफ सफाई करावी, एखाद्या चा जिव जाण्या आधी तरी
जिथे जिथे नाल्यांचे ढापे उघडे आहेत ते उद्धपातळीवर काम करुन बंद करावेत व सामान्य नागरिकांचे जिव वाचवण्याचे काम करावे अशी मागणी करूनही 24 तास उलटले परंतु सदरील ढापा अजूनही उघडाच आहे.
भाऊसाहेब मुके. अपघातग्रस्त परतूर