सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी – शरद पवार
मुंबई, १७ जुलै (हिं.स.) : जरांगेंशी मुख्यमंत्री शिंदेसोबत काय चर्चा केली हे आम्हाला माहीत नाही. सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिले, ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचे वास्तव समोर येत नाही, तोपर्यंत चर्चा करण्यात काही अर्थ नाही, अशी आमची भूमिका होती. एकूणच सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर, ते पवारांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले. या भेटीबद्दल शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली की, मला ताप होता. मात्र, भुजबळांनी भेटायचा आग्रह धरला. महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी आहेत असे ते म्हणाले.
भेटीनंतर भुजबळांनी स्पष्ट केले की, ही राजकीय भेट नव्हती. महाराष्ट्रात मराठी-ओबीसी वादाने सामाजिक ताण वाढल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शरद पवारांना भेटले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये ते वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राची सामाजिक जाण त्यांना सर्वाधिक आहे.