बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित!
पी.एम.किसान योजना हप्ता चौकशीसाठी कृषी खात्यात बोर्ड लावून शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.
वाशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजनेचे २००० रु हप्ता पडलेला नाही. ग्रामसेवकाला चौकशी केली असता ते शेतकऱ्यांना कृषी खात्यात जाऊन चौकशी करण्यास सांगतात परंतु कृषी विभाग वाशी येथे बाहेरच बोर्ड लावलेला आहे की ऑपरेटेड नसल्यामुळे पी.एम.किसानच्या चौकशीसाठी कोणीही येऊ नये
त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. तरीही याची लवकरात लवकर चौकशी करून शेतकऱ्यांना हप्ता लवकरात लवकर देण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.