लोकसभेतील भाषणात केली होती आक्षेपार्ह टीका
नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या अनेक टिप्पण्या रेकॉर्डवरून हटल्या आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हिंदू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले होते. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते 24 तास हिंसा-द्वेष पसरवतात, असे राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान मोदींनीही आक्षेप घेत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे म्हंटले होते.
राहुल गांधी यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, ‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते चोवीस तास हिंसा, द्वेष आणि खोटे बोलत राहतात, ते मुळीच हिंदू नाहीत. सत्याच्या पाठीशी उभे राहावे आणि सत्यापासून कधीही मागे हटू नये असे हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिलेले आहे. अहिंसेचा प्रसार झाला पाहिजे. राहुल यांच्या वक्तव्यावर पीएम मोदींनी आक्षेप नोदंवला. त्यानंतर राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणामधील अनेक टिप्पण्या कामकाजातून हटवण्यात आल्या आहेत.