रायगड, 2 ऑगस्ट (हिं.स.)। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर, बांधावर व पडीक जमीनीवर शेतकऱ्यांना बांबू लागवडीचा लाभ देण्यात येत असून या योजनेंतर्गत बांबू लागवडीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी अलिबाग कैलास वानखेडे यांनी केले आहे.
या करीता हेक्टरी सलग लागवड केल्यास कमाल अनुदान रुपये 7 लाख 4 हजार मिळू शकते. बांबूचा समूचित विकास करणे, बांबूच्या क्षमतेचे पुरेपुर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करून राज्याचा विकास साधने शक्य आहे. बांबूची मागणी, वापर व भविष्यातील औद्योगीक महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेणे त्यांच्या फाद्याचे ठरते.
शेतकरी बांधावांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता संमती पत्रासह अर्ज, 7/12 उतारा, 8अ , आधारकार्डची झेरॉक्स, पास बुकची झेरॉक्स, जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रासह अर्ज आपल्या गावातील कृषी सहायक, ग्राम सेवकांना देता येईल. लागवड करावयाची प्रजाती व रोपांची उपलब्धता बाबत कृषी सहायक आपणास मागदर्शन करतील. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. अधिक माहीतीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी , कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.