साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वाशी मध्ये अभिवादन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त वाशी साठे नगर मध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी महादेव क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्य जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे काँग्रेस चे नेते दिलीप क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी दिलीप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर बोलताना म्हणाले महाराष्ट्र संयुक्त चळवळीत अण्णाभाऊंनी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रातील रहावी म्हणून जागृती व चळवळ प्रखर केली
यानंतर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी अण्णाभाऊंनी अनेक कादंबऱ्या लिहून कथा वगनाट्य यांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी लिखाण केले त्यांच्या या कादंबऱ्यामुळे जगात नाव लोकगीत झाला जग जग बदल घालुनी घाव गेले सांगून मज भीमराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते गुरु मानत होते पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर उतरलेली आहे
यातून अंधश्रद्धा पासून दूर राहावे असे संदेश देत होते असे सांगितले यावेळी साठे नगर मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये ऋषिकेश क्षीरसागर नवनाथ क्षीरसागर बाबू क्षीरसागर बाळासाहेब क्षीरसागर सागर क्षीरसागर ऋतिक क्षीरसागर आदित्य क्षीरसागर रोहन क्षीरसागर आतीष क्षीरसागर चंद्रकांत लोंढे यांनी परिश्रम घेतले