अहमदनगर, 11 जुलै (हिं.स.)।देऊळगाव सिद्धी येथील गायरान जमीन कसल्याने सरपंचाचे पतीच्या आदेशाने हल्ला केलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणीसाठी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सावित्रा काळे यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन केले.सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे मात्र बहिणी वरचे अन्याय अत्याचार देखील थांबवावे,अशी मागणी प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के यांनी केली आहे.
देऊळगाव सिद्धी येथील सवित्रा रमेश काळे यांचे कुटुंबीय भूमिहीन असून हे संपूर्ण कुटुंब गायरान जमीन गट.नं. ४३२ मध्ये नांगर केलेले असून वेळोवेळी शासनास अर्ज केलेले आहेतगायरान जमीन आम्हाला मिळावी म्हणून ३/ ७/ २०२४ रोजी पेरणी करण्यासाठी गेलो असता मला व माझ्या मुलीला जबर मारहाण करण्यात आली.सदर महाराणीसाठी गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर व त्यांच्या पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावा तील काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण केली.
तसेच मोटरसायकल गाडीने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.यातील आरोपी श्रीमंत्या जीवलाल चव्हाण,अनु श्रीमंत चव्हाण,विनोद श्रीमंत चव्हाण,आदेश केरू भोसले व योगेश सिताराम भोसले यांनी मिळून मारहाण केली आहे.संबंधितांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यासाठी गेले असता ठाणे अमलदार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण कररण्यात आले.
सावित्रा काळे समवेत प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के,सायली गायकवाड,मनीषा घोडेराव,रमेश काळे,प्रहार चे तालुका अध्यक्ष गोवर्धन बुलाखे,अर्जुन बुलाखे,लक्ष्मण भोसले,गोट्या भोसले आदीसह कुटुं बातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे निवेदनात म्हंटले आहे की,गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे ठाणे अंमलदार यांच्यावर कारवाई करावी व आरोपींना तात्काळ अटक करून गावातील प्रभाकर बोरकर व नानासाहेब बोरकर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.