तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे ) – शालेय गुणवत्ता विकास अभियान कार्यक्रमा अंतर्गत येरमाळा केंद्रातील नाथवाडी (ता.कळंब) जिल्हा परिषद शाळेची शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी पाहणी केलेल्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणीत समाधान कारक प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांना मिळाली शिक्षणाधिकारी यांची व्हेरी गुड, व्हेरी गुड अशी कौतुकाची थाप मिळाली .
यावेळी मुख्याध्यापक एस. ए.सोळुंखे,पी.आर.लोकरे शिक्षिका उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील शाळा, वस्तीशाळेची १ ते २० ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक शाळेची शालेय गुणवंत्ता विकास अभियान कार्यक्रम अंतर्गत तपासणी आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सोमवारी (ता. २९) दिले आहेत त्या नुसार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी रोज शाळांना भेटी देऊन तपासणी करीत आहेत. तपसणीच्या परिस्थितीचा आढावा रोज सरल पोर्टलवर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, शाळेत गुणवत्तापूर्ण अध्यापन होतेय की नाही,याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत ‘विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान’ सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार,१ ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,तत्सम पदावरील अधिकारी दररोज शाळांना भेटी देणार आहेत.
आयुक्तांच्या याच आदेशानुसार जिल्ह्यात शाळांची तपासणी केली जात आहे.शिक्षण विभाग योजनेची योग्य अंमलबजावणी झाली की नाही,त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत.तपासणी केलेल्या शाळेत कोणते बदल अपेक्षित आहे.अधिकाऱ्यामार्फत अधिका अधिक शाळा तपासल्या जातील,यादृष्टीने शिक्षण उपसंचालकांनी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट निश्चित करून देण्याचे सूचित केले असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
शिक्षण मंत्री घेणार आढावा. संपूर्ण ऑगस्टमध्ये प्रत्येक शाळेची तपासणी केल्यानंतर शाळांमध्ये कोणत्या सुधारणा झाल्या याचा आढावा खुद्द शिक्षण मंत्री घेणार आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त यांच्यासह शिक्षण मंत्री राज्यातील शाळांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत.
चौकट… ऑगस्टच्या पहिल्या २० दिवसांत अधिकारी शाळांना भेटी देऊन तपासणी करतील. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींचा अहवाल त्याच दिवशी सरल पोर्टलवर सादर करण्यात येणार आहेत.