हक्काचा आपला माणूस म्हणून ए.जे. बोराडे यांना विधानसभेत पाठवा – प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे)….. मंठा/ प्रतिनिधी : भाजपा हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे, 2014 मध्ये भाजपने युती तोडली. भाजपचे अनेक लोक शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले, आता या निवडणुकीत परतुर मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी आमदार तथा परभणी लोकसभा समन्वयक शिवाजीराव चोथे यांनी व्यक्त केला. मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात गुरुवार ता. 25 रोजी आयोजित शिवसेना सदस्य नोंदणी आरंभ व बूथप्रमुख, पदाधिकारी बैठकीत श्री चोथे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना संघटक प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, ज्येष्ठनेते अंकुशराव अवचार, परतुर तालुकाप्रमुख सुदर्शन सोळंके, मंठा तालुकाप्रमुख अजय अवचार,विधानसभा समन्वयक अशोक आघाव, युवा सेना जिल्हा समन्वयक महेश नळगे, बेबीताई पावसे, बालासाहेब बोराडे, जे. के.कुरेशी, शहरप्रमुख वैजनाथ बोराडे, सुभाषराव घारे यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना श्री चोथे म्हणाले की, परतुर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी मागणी करण्यात आली असून पक्षाचे निष्ठेने कार्य करणारे जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे सांगून त्यांनी उपप्रमुखांकडून गाव निहाय आढावा घेतला. प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे गद्दारांनी पक्ष चोरला चिन्ह चोरले झेंडे बदलले नेते बदलले मात्र निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली.
या सरकारच्या लाडकी बहीण लाडक्या भाऊ या योजना फसव्या आहेत त्यांना त्यांची जागा वेळीच दाखवून देण्याची ही वेळ आली आहे. भाजपा पूर्णपणे जातीवादी पक्ष असून सत्तेसाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बूथप्रमुखांनी संपूर्ण मतदार यादीवर आतापासून लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे प्रास्ताविक करताना म्हणाले की, परतुर मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली, या मतदारसंघात 30-35 वर्षापासून शिवसेनेचे प्रचंड जाळे निर्माण झाले आहे.
गावागावात तांड्या तांड्यात वस्ती वाडीवर जाऊन शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी ही जागा असेल अशी ग्वाही दिली. या निवडणुकीत भाजपची हुकुमशाही, सत्ता आणि पैशाचा माज उतरविण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे, भाजपला या मतदारसंघातून हद्दपार करण्याच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले. जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी सभापती संतोष वरकड बाबाराव राठोड सुरेश सरोदे माऊली सरकटे, संजय नागरे,मधुकर काकडे डॉक्टर दत्तात्रय काकडे, डॉ. संतोष पवार, ॲड.ज्ञानेश्वर जाधव, अरुण उफाड, केशव महाराज सरकटे, दत्ता पा. सुरुंग, तुळशीराम कोहिरें, वसंतराव राऊत, दासू खरात, बबन शेळके, पांडू वैद्य, विष्णुपंत खराबे, आसाराम बोराडे, संतोष वरकड, डॉ. उद्धव उबाळे, रामेश्वर शिंदे, कैलास पोटे, बंडू मोरे, अशोक मुरकुटे, अचित बोराडे, प्रदीप बोराडे, अरुण वाघमारे, उबेद बागवान, दिगंबर बोराडे, नाना बोराडे, संदीप वायाळ, शेख अन्सार, मनु गिरी, नवनाथ अवचार, अनु काकडे, मनोज वायाळ,संतोष खारवणे, दिलीप कव्हळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू दायमा यांनी केले.
मतदारसंघातील भाजपची मस्ती उतरवा — ए.जे. बोराडे…. परतुर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे, भाजपची हुकूमशाही, मस्ती, सत्ता आणि पैशाचा माज उतरविण्याची वेळ आहे. या निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड ताकदीने कामाला लागावे असे सांगून या मतदारसंघात 50 हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी केले.