Thursday, October 16, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रवण, मनन आणि मुक्तीचा मार्ग;श्रीमद्भागवत कथेचे महात्म्य : ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2025
in education, maharashtra, social, top news
0
महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/बार्शी : श्रीभगवंत मंदिर, बार्शी येथे सुरु असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेच्या पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन’ या विषयावर भावपूर्ण निरुपण करताना श्रवणाबरोबर मननाचेही अत्यंत महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘फक्त श्रवण करुन भागत नाही, तर त्यासोबत मनन करणेही तितकेच आवश्यक आहे. कारण श्रवण आणि मननाच्या द्वारेच खरे ज्ञान प्राप्त होते आणि हाच ज्ञानाचा प्रकाश जीवाला मोक्षाकडे नेतो.’ परंतु हे ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी विवेकाचे अस्तित्व अनिवार्य आहे. विवेक म्हणजेच सार–असाराचे भान, जे ज्ञानाच्या प्राप्तीचा मूलाधार ठरतो.
महाराज पुढे सांगतात, ‘श्रवण सर्वजण करतात, पण मनन सर्वच करत नाहीत.’ श्रीमद्भागवत श्रवण करताना त्या कथेचे श्रवण, मनन आणि निदिध्यास या त्रिसूत्री प्रक्रियेतूनच आत्मिक उन्नती शक्य होते. भागवत महात्म्यात धुंधुकारीचे उदाहरण दिले आहे. तो पापी असूनही भागवत कथा ऐकून त्याने मनन केले, म्हणूनच मोक्षास पात्र ठरला. त्यामुळे श्रवणाबरोबर मनन करणाऱ्यालाच मुक्ती प्राप्त होते, हे भागवत तत्वज्ञान स्पष्ट करते.
डॉ. जयवंत महाराज मार्गदर्शन करताना सांगतात, “श्रवण करताना सर्व इंद्रियांनी त्याचे आश्रय घेतले पाहिजे. तेव्हाच ‘कथामृत’ रसाचे खरे सेवन होऊ शकते.” लक्षपूर्वक श्रवण आत्महिताची बीजे रोवते, जीवनात साक्षात पूर्णत्व निर्माण करते आणि जीवाच्या हृदयात शाश्वत आनंदाचे झरे उगम पावतात. हीच आहे मननयुक्त श्रवणाची अपूर्वाई, जी महाराज भाविकांपुढे नेमकेपणाने उलगडतात. “जे ज्ञान चित्तामध्ये दृढ होत नाही, ते व्यर्थ; प्रमादपूर्वक केलेले श्रवण व्यर्थ; संशयभावनेतून केलेले मंत्रपठण निष्फळ आणि चंचल चित्ताने केलेला जप देखील निष्फळ ठरतो.” या सिद्धांतांचा विस्तार डॉ.जयवंत महाराज विविध उदाहरणांच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवतात.
श्रवण करताना काय भाव अपेक्षित आहेत? याचे वर्णन करताना ते सांगतात. गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास असावा, स्वतःत दीनता असावी, मनातील दोषांवर विजय मिळवावा आणि कथा ऐकताना बुद्धी स्थिर ठेवावी. कैमुत्तिक न्यायाने त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला “जर निर्जीव बांबूच्या गाठी भागवत श्रवणामुळे सुटू शकतात, तर चेतन जीवाच्या अंतरंगात असलेल्या अज्ञानाच्या गाठी सुटणार नाहीत का?” या दृष्टांतातून भागवत कथा ही अज्ञानाच्या गाठी सोडणारे प्रभावी साधन आहे, हे अधोरेखित होते.
त्यांनी धर्मराज आणि भगवान विष्णू यांच्यातील संवादाचे उदाहरण दिले. धर्मराज भगवंताला म्हणतात. ‘हे प्रभो! मी पापक्षालनासाठी तीर्थयात्रेला जात आहे.’ त्यावर भगवंत त्याला कडुलिंबाची एक छोटी काडी देतात आणि सांगतात – ‘स्नान करताना ती देखील बुडव.’ तीर्थयात्रेनंतर परतल्यावर भगवंत विचारतात – ‘कडुलिंबाची चव बदलली का?’ धर्मराज म्हणतो – ‘नाही, ती अजूनही कडूच आहे!’ या उदाहरणातून महाराज स्पष्ट करतात की, परमार्थामध्ये केवळ कृती नव्हे तर त्यामागची भावना देखील शुद्ध असली पाहिजे.
 चित्तातील संस्कार हेच माणसाच्या वर्तनातून प्रकट होतात. आहार, वावरण्याचे वातावरण, संस्कृती आणि समवेत असलेली ऊर्जा यांचा परिणाम चित्तावर होतो. आणि हेच चित्त शुद्ध करण्याचे कार्य श्रीमद्भागवत कथा करते. म्हणून ही कथा हे ‘कथातीर्थ’ आहे – जे शरीर नव्हे तर चित्त आणि मनाचे स्नान घडवते.
तीर्थांत शरीराचे स्नान होते, पण भागवत कथारुपी तीर्थात मनाचे शुद्धिकरण होते. हेच शुद्ध मन जीवाला मुक्तीकडे नेतं. पण यासाठी आपणाला त्या भागवत कथारुपी तीर्थामध्ये मनोभावे स्नान करणे आवश्यक आहे. असा हा भागवत चिंतनाचा अमृतमय गंगा प्रवाह जो जीवाला परिपक्व करतो, विवेक जागवतो आणि मुक्तीकडे घेऊन जातो.  डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे आजच्या सत्रातील मार्गदर्शन आत्मदर्शनाची वाटचालीसाठी पूरक होते.
Previous Post

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत : व्हाईस ऑफ मीडिया’ने दिला मदतीचा हात!

Next Post

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोलेरोतून जनावरांची अवैध वाहतूक उघड, एक जण अटकेत

October 16, 2025

अतिवृष्टीने वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर 

October 16, 2025

रुद्र भूमी करीता जागा उपलब्ध करून द्यावी

October 16, 2025

मॅरेथॉन स्पर्धेत डॉ.अंजली शिंगे यांचे विशेष यश…  प्रथम क्रमांक केला प्राप्त

October 16, 2025

वाचनाने मला समृद्ध बनविले – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर 

October 16, 2025

मुस्लिम कारागिराचे खुणावताहेत बोम्मारिल्लू… हैदराबाद, बंगलोर, मुंबई, भिवंडीकडे रवाना झाले आकर्षक बोम्मारीलू

October 16, 2025

शेतकऱ्यांना आधार लिंकच्या आधारे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी

October 16, 2025

पुण्याहून विक्रीसाठी मागविलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदीलांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

October 16, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Load More

राजकीय

राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह

by Makrand Dhobale
October 15, 2025
0

मुंबई - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना राज्यातील महाविकास आघाडी व मनसेने...

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल : माजी खा. राजाराम

by Makrand Dhobale
October 13, 2025
0

सोलापूर : बसपा हा एक आदर्श विचारधारा जोपासणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातही आपण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सर्वत्र पाय रोवले...

आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा, जरांगेंनाही टोला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 10, 2025
0

नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणातील(OBC reservation) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात नागपूर (Nagpur) येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला असून 2 सप्टेंबर रोजी काढण्यात...

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 25, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group