Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रवण, मनन आणि मुक्तीचा मार्ग;श्रीमद्भागवत कथेचे महात्म्य : ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2025
in education, maharashtra, social, top news
0
महाशिवरात्रीला घडत आहेत दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्त
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/बार्शी : श्रीभगवंत मंदिर, बार्शी येथे सुरु असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेच्या पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन’ या विषयावर भावपूर्ण निरुपण करताना श्रवणाबरोबर मननाचेही अत्यंत महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘फक्त श्रवण करुन भागत नाही, तर त्यासोबत मनन करणेही तितकेच आवश्यक आहे. कारण श्रवण आणि मननाच्या द्वारेच खरे ज्ञान प्राप्त होते आणि हाच ज्ञानाचा प्रकाश जीवाला मोक्षाकडे नेतो.’ परंतु हे ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी विवेकाचे अस्तित्व अनिवार्य आहे. विवेक म्हणजेच सार–असाराचे भान, जे ज्ञानाच्या प्राप्तीचा मूलाधार ठरतो.
महाराज पुढे सांगतात, ‘श्रवण सर्वजण करतात, पण मनन सर्वच करत नाहीत.’ श्रीमद्भागवत श्रवण करताना त्या कथेचे श्रवण, मनन आणि निदिध्यास या त्रिसूत्री प्रक्रियेतूनच आत्मिक उन्नती शक्य होते. भागवत महात्म्यात धुंधुकारीचे उदाहरण दिले आहे. तो पापी असूनही भागवत कथा ऐकून त्याने मनन केले, म्हणूनच मोक्षास पात्र ठरला. त्यामुळे श्रवणाबरोबर मनन करणाऱ्यालाच मुक्ती प्राप्त होते, हे भागवत तत्वज्ञान स्पष्ट करते.
डॉ. जयवंत महाराज मार्गदर्शन करताना सांगतात, “श्रवण करताना सर्व इंद्रियांनी त्याचे आश्रय घेतले पाहिजे. तेव्हाच ‘कथामृत’ रसाचे खरे सेवन होऊ शकते.” लक्षपूर्वक श्रवण आत्महिताची बीजे रोवते, जीवनात साक्षात पूर्णत्व निर्माण करते आणि जीवाच्या हृदयात शाश्वत आनंदाचे झरे उगम पावतात. हीच आहे मननयुक्त श्रवणाची अपूर्वाई, जी महाराज भाविकांपुढे नेमकेपणाने उलगडतात. “जे ज्ञान चित्तामध्ये दृढ होत नाही, ते व्यर्थ; प्रमादपूर्वक केलेले श्रवण व्यर्थ; संशयभावनेतून केलेले मंत्रपठण निष्फळ आणि चंचल चित्ताने केलेला जप देखील निष्फळ ठरतो.” या सिद्धांतांचा विस्तार डॉ.जयवंत महाराज विविध उदाहरणांच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवतात.
श्रवण करताना काय भाव अपेक्षित आहेत? याचे वर्णन करताना ते सांगतात. गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास असावा, स्वतःत दीनता असावी, मनातील दोषांवर विजय मिळवावा आणि कथा ऐकताना बुद्धी स्थिर ठेवावी. कैमुत्तिक न्यायाने त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला “जर निर्जीव बांबूच्या गाठी भागवत श्रवणामुळे सुटू शकतात, तर चेतन जीवाच्या अंतरंगात असलेल्या अज्ञानाच्या गाठी सुटणार नाहीत का?” या दृष्टांतातून भागवत कथा ही अज्ञानाच्या गाठी सोडणारे प्रभावी साधन आहे, हे अधोरेखित होते.
त्यांनी धर्मराज आणि भगवान विष्णू यांच्यातील संवादाचे उदाहरण दिले. धर्मराज भगवंताला म्हणतात. ‘हे प्रभो! मी पापक्षालनासाठी तीर्थयात्रेला जात आहे.’ त्यावर भगवंत त्याला कडुलिंबाची एक छोटी काडी देतात आणि सांगतात – ‘स्नान करताना ती देखील बुडव.’ तीर्थयात्रेनंतर परतल्यावर भगवंत विचारतात – ‘कडुलिंबाची चव बदलली का?’ धर्मराज म्हणतो – ‘नाही, ती अजूनही कडूच आहे!’ या उदाहरणातून महाराज स्पष्ट करतात की, परमार्थामध्ये केवळ कृती नव्हे तर त्यामागची भावना देखील शुद्ध असली पाहिजे.
 चित्तातील संस्कार हेच माणसाच्या वर्तनातून प्रकट होतात. आहार, वावरण्याचे वातावरण, संस्कृती आणि समवेत असलेली ऊर्जा यांचा परिणाम चित्तावर होतो. आणि हेच चित्त शुद्ध करण्याचे कार्य श्रीमद्भागवत कथा करते. म्हणून ही कथा हे ‘कथातीर्थ’ आहे – जे शरीर नव्हे तर चित्त आणि मनाचे स्नान घडवते.
तीर्थांत शरीराचे स्नान होते, पण भागवत कथारुपी तीर्थात मनाचे शुद्धिकरण होते. हेच शुद्ध मन जीवाला मुक्तीकडे नेतं. पण यासाठी आपणाला त्या भागवत कथारुपी तीर्थामध्ये मनोभावे स्नान करणे आवश्यक आहे. असा हा भागवत चिंतनाचा अमृतमय गंगा प्रवाह जो जीवाला परिपक्व करतो, विवेक जागवतो आणि मुक्तीकडे घेऊन जातो.  डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे आजच्या सत्रातील मार्गदर्शन आत्मदर्शनाची वाटचालीसाठी पूरक होते.
Post Views: 20
Previous Post

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत : व्हाईस ऑफ मीडिया’ने दिला मदतीचा हात!

Next Post

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत धोपटेश्वर येथे शेतकरी मेळावा!

ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677893

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697