अमरावती, 30 जुलै, (हिं.स.) – पंढरपूर यात्रा महोत्सवाकरिता पंढरपूर, पुणे, आळंदी आदी ठिकाणी अतिरिक्त – बसेस सोडण्यात आल्या होत्या. या यात्रा महोत्सवा दरम्यान महिला, ६५ वर्षावरील ज्येष्ठ व ७५ वर्षावरील अमृत नागरिकांना तब्बल ६५ लाख ९६ हजार ७३७ रुपयांची सवलत 3 योजने अंतर्गत एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. या दरम्यान जिल्ह्यातून २१३ बसेसच्या माध्यमातून ४१७ फेऱ्या करण्यात आल्या.
या दिवसांमध्ये जिल्ह्यातील ४० हजार • ४७२ विठ्ठल भक्तांनी प्रवास केला. दरवर्षी प्रवाशांच्या सुविधेकरीता एसटी महामंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त अतिरिक्त बस सोडल्या जातात. यंदा जिल्ह्यातील आठ आगारातून अमरावती ते पंढरपूरकरिता १६३ बसेस सोडण्यात आल्या. याशिवाय पंढरपूर ते पूणे, आळंदी करीता ३५ आणि रिंगण यात्रेकरिता १५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. अशा एकूण यात्रा महोत्सवा करीता २१३ बसेसच्या ४१७ फेऱ्या करण्यात आल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला प्रत्यक्षात ५० लाख २६ हजार २५ रूपयांचे उत्पन्न झाले आहे.
याशिवाय बसमधून महिलांना व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचाही लाभ देण्यात आला आहे. अशी ६५ लाख ६९ हजार ७३७ रुपयांची सवलत या प्रवाशांना योजनेअंतर्गत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला केवळ आषाढी यात्रा महोत्सवा पोटी १ कोटी १५ लाख ९५ हजार ७६२ रूपयांचे निव्वळ – उत्पन्न झाले आहे. जिल्ह्यातून सुमारे ४० हजार ४७२ विठ्ठल भक्तांनी – बसमधून प्रवास केला आहे. याबाबत विभागीय वाहतुक अधिकारी योगेश ठाकरे यांनी माहीती दिली.