विद्यार्थींनी उच्चशिक्षण घेऊन स्वलंबी व्हावे! – माजी मा. चोथे
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड दि १८ जुलै/ गुरवार (शहागड).: येथे तालुक्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात अध्यक्षीय भाषणाच्या वेळी माजी आमदार शिवाजी चोथे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थींनी येत्या स्पर्धात्मक युगासाठी स्वतःला तयार करण्याचे आव्हान केले व विद्यार्थींना फक्त बारावीवर शिक्षण न थांबता उच्चशिक्षण घेऊन,
स्वतःच्या पायावर उभा राहिल्या पश्चात पालकांनी त्यांच्या मुलीच्या विवाहाचा विचार करावा असे आव्हान पालकांना केले.
यावेळी व्यासपीठावर युवासेना विभागीय सचिव विनायक चोथे, डॉ संभाजी चोथे, गटनेते इलियास कुरेशी, चंद्रकांत लांडे, विठ्ठलराव फरताडे, श्रीमंत खाटके, भुजंग सुरशे, अर्जुन शेंडगे, माजी सरपंच विजय नाझरकर, शिवसेना विभागप्रमुख राजेश राऊत, , रजनीश कणके, राजेंद्र छिल्लारे, मुख्याध्यापक खंडेभरड सर बबलू कादरी, लक्ष्मण धोत्रे, शरीफ तांबोळी, शिवाजी ढवळे, रामेश्वर धापसे, बंडू वाघमारे यांच्यासह युवासनेचे तालुकधिकरी गणेश शिंदे, अभिजित खटके, अनिकेत कोल्हे, गणेश गायकवाड, योगेश उंबरे, शरद पिटरे, गणेश उंबरे, प्रशांत जाधव, जयवर्धन कणके,
नकारण जगताप तसेच बाळासाहेब गावडे पत्रकार तरुण भारत अंबड सय्यद इरफान, अकबर शेख हे पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी पंचकृषीतील गुणवंत विद्यार्थी व पालक तसेच शिवसेना- युवासेना (उबाठा) चे अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्य संख्याने हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री विनायक चोथे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” ह्या भागात मा.आ. चोथे साहेबांनी विविध शाळा, महाविद्यालये सुरू करुन जी शिक्षणाची चळवळ सुरू केली त्याचाच भाग म्हणून
आपल्या भागातील गुणवंतांच्या पाठीवर समाजाने कौतुकाची थाप मारावी आणि त्यातून विद्यार्थांना आणखीन यशाची शिखर पादाक्रांत करण्याची प्रेरणा मिळावी या साठी आम्ही गेली पाच वर्ष अंबड व घनसावंगी तालुक्यात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो, तसेच शिवसेनेत काम करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे ८०% समाजकारण व २०% राजकारण हा वासा घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.” अश्या शब्दात भावना व्यक्त केल्या.यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.