अंबड घनसावंगी 8 जुलै काका… पावसामुळे शाळेच्या रस्त्यावर चिखल झालाय… आम्हाला रोज गुढघाभर पाण्यातून शाळेत जावे लागते , आमच्या शाळेचा रस्ता करून द्या प्लीज. अशा केविलवाण्या स्वरात देवडी हादगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांना फोन आला. सतीश घाटगे यांनी काही तासात गावात येऊन शाळेला भेट दिली. रस्त्याची अवस्था बघितली. अन मुलांचे हाल तात्काळ थांबविण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे आदेश समृद्धी कारखान्याच्या यंत्रणेला दिले. तसेच हा रस्ता पावसाळा संपताच सिमेंट कॉंक्रीटने तयार करून देण्याचा शब्द इथल्या जनतेला दिला.
देवडी हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जाणारा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे. सोमवारी शाळकरी मुलांचे चिखलातून जातानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. घनसावंगीच्या आमदाराने पोतेभर नारळ फोडले, पण देवडी हातगावातील गरिबांच्या लेकरासाठी रस्ता केला नाही…अशा शब्दात पालक आपल्या प्रतिक्रिया देतानाचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर दिसू लागले होते. सकाळी सतीश घाटगे यांना शाळेतील मुलाने फोन करून आमच्या शाळेचा रस्ता करून द्या अशी विनवणी केली होती. त्या मुलाच्या वेदनेने भरलेला आवाज ऐकून सतीश घाटगे काही तासात गावात पोहचले. शाळेला भेट देऊन रस्त्याची अवस्था बघितली. लहान मुलांचे शाळेत येताना होणारे हाल पाहून घाटगे साहेबांनी त्वरित या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश समृद्धी कारखान्याच्या यंत्रणेला दिले.
तसेच हा रस्ता पावसाळा संपताच सिमेंट कॉंक्रीटने तयार करून देण्याचा शब्द गावच्या जनतेला दिला. यापेक्षा मोठ दुर्दैव असू शकत नाही. जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ता नाही. हा रस्ता करून देण्यासाठी पालकांनी ग्रामपंचायतिकडे वारंवार मागणी केली. परंतु अनकेदा रस्त्याच्या कामाचे नारळ फुटले. पण रस्ता काही झाला नाही. असे गावकऱ्यांनी सांगितले.
लहान मुलांचे शाळेत येताना होणारे हाल तात्काळ थांबविण्यासाठी या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था समृद्धी कारखाना उद्या करणार आहे. तर हा रस्ता पावसाळा संपताच सिमेंट कॉंक्रीटने तयार करून देण्याचा शब्द इथल्या जनतेला दिला. विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी हा रस्ता करून देतो म्हणून कामाच्या उद्घाटनाचे पोतेभर नारळ फोडले, पण देवडी हातगावातील गरिबांच्या लेकरासाठी रस्ता केला नाही. असे यावेळी गावकऱ्यांनी घाटगे यांना सांगितले. यावेळी गावकरी व शाळकरी मुळे मोठ्या संख्येने उपस्थित.
जिल्हा परिषद शाळात गरिबांची मुळे शिकतात. ही मुले उद्याचे भविष्य आहे. त्यांच्या वाटेला अशा वेदना येत असतील तर हे समाज व्यवस्थेचे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधीला जर या गोष्टी दिसत नसतील तर अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवणे गरजेचे आहे. केवळ राजकारणासाठी जनतेचा वापर थांबला पाहिजे. जनतेनीही विकासाचे व्हिजन असलेला नेता आगामी निवडणुकीत निवडावा. हा रस्ता समृद्धी कारखाना स्वखर्चातून लवकरच दुरुस्त करून देणार आहे.
सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना