अमरावती 25 जुलै (हिं.स.)भारतीय सांस्कृतिक क्षणांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सर्व सण हिंदू पंचांगानुसार होत असल्याने ग्रामीण व कृषी संस्कृती जुळलेली आहे. सणांची सुरुवात गुरुपोर्णिमा या महत्वपूर्ण सणांपासून होत असून रविवारी २१ जुलै रोजी हा सण घराघरात साजरा करण्यात आला. याच दिवशी शिष्य आपल्या गुरूचे पूजन करून आशीर्वाद घेतात. शाळा ते आखाडा, क्रीडा मैदानावर आणिमंदिरात सुद्धा विधिवत पूजा केली जाते. यावेळी पहिला श्रावण सोमवार ५ ऑगस्टला असून नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती आणि पोळा पिठोरी है महत्त्वाचे सण येतात.
सणापासून जगण्याचा आनंद मिळतो तो वेगळाच. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात पाच सोमवार येतात. भगवान शंकराच्या उपासकांसाठी हा महिना पवित्र मानल्या गेलेला आहे. याच महिन्यात भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जाते त्यामले श्रावणसोमवार भगवान शंकराला समर्पित असून त्यांची कृपादृष्टी सदैव राहावी अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सोमवार ५ ऑगस्ट, दुसरा १२ऑगस्ट तिसरा १९ ऑगस्ट, चौथा २६ ऑगस्ट आणि पाचवा तसेच शेवटचा श्रावण सोमवार हा २ सप्टेंबरला आहे.
गुरुपौर्णिमेनंतर सणांना सुरुवात होऊ नागपंचमी, मंगळागौरी, स्वातंत्र्य दिन नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जीवतिव पूजन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि शेवटच्या श्रावण सोमवारी पोळा हा सण येतो. पोळ्यानंतर पाऊस काही सा कमी होतो, अशी आख्यायिका आहे. श्रावण महिन्यात अनेक भाविक भक्त भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंग दरशासाठी जात असतात. बरेचदा श्रावण महिन्या चार सोमवार येतात, यावेळी मात्र पाच सोमवार आले हे विशेष. महिन्याती सर्वात सुखद आणि आनंदायी महिन म्हणजे श्रावण,या महिन्यात सणांची रेलचेल असल्याने सर्वांना हवाहवासा वाटतो.खास करून महिला या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात.