शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच PM किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. अशातच आता PM किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी आणि एनपीसीआय करुन घेणं गरजेचं आहे. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे.
मात्र याकडे काही शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. अशा शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता मिळणार नाही. हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांनी या योजनेशी संबंधित सर्व अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे.