रांची, 30 जुलै (हिं.स.) : झारखंडमधील सरायकेला-खरसावन जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटे मुंबई-हावडा मेलचे (गाडी क्र.12810) 18 डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले. एकूण जखमींपैकी पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर घटनास्थळी उपचार करण्यात आले. मात्र, काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चक्रधरपूर रेल्वे विभागाचे पीआरओ म्हणाले की, हावडाहून सोमवारी रात्री निघालेल्या या ट्रेनला मंगळवारी पहाटे अपघात झाला. प्रवाशांना पाठवण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. जमशेदपूरपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या बाराबांसजवळ पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाला. हे ठिकाण पश्चिम सिंगभूमपासून अगदी जवळ आहे. मुंबई-हावडा मेलचे 22 पैकी 18 डबे बाराबांजवळ रुळावरून घसरले. यापैकी बी-4 डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याचवेळी याच डब्यात आणखी एक व्यक्ती अडकल्याची माहिती समोर येत आहे. असे एकूण 16 प्रवासी डबे होते,
एक पॅन्ट्री कार होती, तर एक पॉवर कार होती. बडाबांसमधील जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यांना आता चक्रधरपूर येथे चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. यासोबतच पश्चिम सिंगभूमचे विभागीय आयुक्त कुलदीप चौधरी यांनी सांगितले की, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण पश्चिम सिंगभूम आणि सरायकेला-खरसावनच्या सीमेजवळ आहे. झारखंडमधील चक्रधरपूरजवळ हावडा-मुंबई एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर हावडा रेल्वे स्थानकावर हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे. दरम्यान, अपघातामुळे 5 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 4 गाड्या आधीच्या/पुढील स्टेशनवरूनच थांबवण्याचा किंवा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक-
टाटानगर : 0657-2290324
चक्रधरपूर : 06587238072
राउरकेला: 06612501072, 06612500244
हावडा: 9433357920, 03326382217
रांची : 0651-27-87115
एचडब्ल्यूएच हेल्प डेस्क: 033-26382217, 9433357920
एसएचएम हेल्प डेस्क: 6295531471, 7595074427
केजीपी हेल्प डेस्क: 03222-293764
सीएसएमटी हेल्पलाइन ऑटो क्रमांक 55993
पी-एन्ड-टी 022-22694040
मुंबई: 022- 22694040
नागपूर: 7757912790