तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
दि 10 जुलैभाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या राजवटीत कष्टकरी जनतेने केलेल्या सततच्या आंदोलनाच्या मोहिमा आणि संघर्षांमुळे बेरोजगारी, महागाई, कामाची परिस्थिती, पेन्शन इत्यादी जनतेच्या रोजीरोटीचे प्रश्न समोर येत आहे. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटू च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये अंगणवाडी कर्मचारी बांधकाम कामगार शेतमजूर कामगार महानगरपालिका कामगार यांचा मोठ्या संख्येने समोर होता सरकारच्या विरोधात व संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जालना येथील सरकारी कामगार अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून भांडी वाटपाचा कॅम्प मागणी केली आहे परंतु सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील लोकांनाच भांडी वाटपाचे कॅम्प देत असून इतर कामगार जाणीवपूर्वक कॅम्प दिले जात नाही. त्यांचे बरेच प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.या संदर्भातही निवेदन जिल्हाधिकारी यांना देऊन योग्य ती कारवाई करा. अशी मागणी करण्यात आली.मागण्या करण्यात करण्यात आल्या.१.कामगार संहिता रद्द करा,२.NMP रद्द करा आणि खाजगीकरणाचे इतर प्रकार थांबवा, ३.सर्व कामगारांसाठी किमान वेतन 26000 रुपये प्रति महिना पेक्षा कमी नको.
४.कंत्राटदार बदलला असतानाही कंत्राटी कामगारांना कायम ठेवून कंत्राटी कामगारांसाठी नोकरीची सुरक्षितता सुनिश्चित करणे; कायम कामगार, अग्निवीर, आयुधवीर आणि कोयलावीर आणि इतर निश्चित मुदतीच्या नोकर्याप्रमाणे समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना समान वेतन आणि लाभ,५.योजना कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा आणि मध्यान्ह भोजन सेवक आणि इतर यांना कामगार म्हणून ओळख आणि त्या सर्वाना पेन्शनसह किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभ सुनिश्चित करा, ६.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक त्वरित यावा.७. नोदित बांधकाम कामगारांना मोटार सायकल वाटप करून मोफत लायसन्स वितरित करा.
८.नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य त्वरित वाटप करा. ९.जालना शहराचा विस्तार लक्षात घेता त्वरित कामगारांची भरती करण्यात यावी, ९.सफाई कामगारांसाठी आश्वासन दिलेल्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी, १०.सफाई कामगारांना सणाच्या सुट्ट्या दिल्या जात नाहीत त्या दिवशी त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदला ला देण्यात यावा, ११.कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा,१२.सफाई कामगारांची नवीन भरती करत असताना कोविड मध्ये काम केलेल्या जुन्या कामगारांना प्रधान्य देऊन त्यांना कामावर घेण्यात यावे.
इत्यादी मागण्या करण्यात आल्या.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, सिटू चे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, शेतमजूर युनियन चे राज्याध्यक्ष मारोती खंदारे, अंगणवाडी संघटनेच्या नेत्या डॉ.सुनंदा तिडके, सिटू चे जिल्हा सचिव ॲड.अनिल मिसाळ, कांता मिटकरी सजेदा, सय्यद, कांचन वाहुळे, प्रभाकर कुलकर्णी, हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे मदन एखंडे रवी भरदर्गे , बाबासाहेब पाटोळे, भगवान कोळे, लताबाई टेकुर,संजय जगधने, विमल वाघमारे, मंगल साबळे, सखाराम बिटले, राहुल हनवते, सुभाष काफरे, शरद सावंत यांच्या सह शेकडो कामगार उपस्थित होते.