देगलूर(प्रतिनीधी) : येथील मानव्य विकास विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभागाकडून आज शाळेच्या मैदानात असलेल्या ६१ वर्षीय पिंपळाच्या वृक्षाला राखी बांधून वृक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून आणल्या होत्या. राख्यावर झाडे लावा झाडे जगवा,वृक्ष आपला सोबती ,वृक्ष संवर्धन पर्यावरण रक्षण असे विविध घोषवाक्य लिहिले होते.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाची चर्चा होत होती तर सदरील राख्यांचे निरीक्षण सर्वांकडून कौतुकाने केले जात होते. शाळेत मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करण्यात आले आहे . दरवर्षी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विविध भारतीय वृक्षांना राख्या बांधून वृक्षाबंधन साजरा केला जातो.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी हा या कार्यक्रमा मागचा उद्देश आहे.
वृक्षाबंधन कार्यक्रमात मुख्याध्यापक संतोष कोल्हे,पर्यवेक्षक शरद हान्द्रे,श्याम कोल्हे,शिक्षक प्रतिनिधी संजय कल्याणी, राजेश चौडेकर ,मनोज मोरे, बालाजी भांगे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे अध्यक्ष शिवानंद स्वामी ,उपाध्यक्ष अर्जुन सुंकेवार आदींनी परिश्रम केले.