शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी धरणातून सोडावे लागणार आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुसरीकडे उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये देखील तशीच चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी यापूर्वीच सव्वामीटरने खाली गेली असून मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ३८ अंशावर गेले असून नवीन लागवड केलेली पिके या तडाख्यात माना टाकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा न्यायला बंदी घातली असून सर्व साठ्यांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महावितरण विभागाला पत्र पाठविले असून उजनीतून पाणी सोडल्यानंतर १० ते २१ मार्च या काळात टप्प्याटप्प्याने भीमा नदीकाठच्या कृषीपंपांचा विद्युतपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. औज बंधाऱ्यात पाणी पोचले की धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाणार असून त्यानंतर थेट एप्रिलअखेर किंवा मे महिन्यातच उजनीतून पुन्हा सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...