जेव्हा लोकप्रिय अभिनेते उपेंद्र लिमये यांना गर्व झाला होता तेव्हा एका स्पॉटबॉयने त्यांना जमिनीवर आणलं होतं.
लोकप्रिय मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांचा अभिनय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यांनी ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘आणीबाणी’, ‘धग’ या सारख्या मराठी सिनेमात तर ‘अंतिम’, ‘अॅनिमल’ यांसारख्या हिंदी चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारल्या. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उपेंद्र हे कायम शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी मी पणा हा येतोच. अहंकाराच्या पायरीपाशी जाऊन सगळेच परत आलेले असतात. असाच मी पणा हा उपेंद्र यांनाही आला होता. मात्र एका स्पॉटबॉयच्या बोलण्याने ते पुन्हा जमिनीवर आले. एका मुलाखतीत त्यांनी या प्रसंगाबद्दल सांगितलं होतं.
उपेंद्र पुढे म्हणाले, ‘जाता जाता तो माझ्याकडून घेणार तेवढ्यात मुस्काटात मारावी तशी तो बोलला, आपको पता नही लेकिन बच्चन साहब भी इसमे ही चाय पिते हैं. असं बोलल्यावर मी लगेच नको नको राहूद्या मी पितो यातच चहा असं म्हणत तो कप परत घेतला. एवढा मोठा माणूस पण त्याला कसलाच अहंकार नाही. आपण कोण त्यांच्यासमोर. त्यादिवशी मी पुन्हा जमिनीवर आलो.’ यासोबतच त्यांनी आणखीही काही किस्से या मुलाखतीत सांगितले होते.