▶️हजारों कोटींच्या कामांचे उद्घाटने व भूमिपूजन थाटात साजरे करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी हिब्बट – देगलुर रोडचा प्रश्न सुटेना काय..?
मुखेड :- प्रतिनिधी / ॲड. रणजित जामखेडकर
मुखेड तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसुन येते आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघावर अनेक भावी आमदारांनी दावा केलेला आहे.खंडीभर भावी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून शहरात तळ ठोकुन बसले आहेत.
भावी आमदारांनी भाजपाच्या विद्यमान आमदारांना आव्हान देत आम्ही एमआयडीसी, बायपास, रेल्वे लाईन, लेंढी प्रकल्प,मेट्रो रेल्वे सारखे मातभर आश्वासनं देऊन मतदारांना भुरळ घातली आहेत.
मागील १० वर्षांपासून
केंद्रात तर ८ वर्षे राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या विद्यमान लोकप्रतिनिधीना डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते ,गटूचा रोड, स्मशानभूमी यापुढे काही सुचलंच नाही की काय अशीच परिस्थिती आहे.तर महामार्गांना मंजुरी अणल्याची श्रेय घेण्यापलीकडे यांच्याकडे आता उरलयच काय ?. हि वस्तुस्थिती आहे.
मुखेड ते देगलुर जोडला जाणारा मुख्य आणि जवळच्या रोड म्हणून ओळखले जाणाऱ्यां मुखेड – हिब्बट – एकलारा – खानापूर मार्ग देगलुर हे रोड २०१९ पासुन बाधीत शेतकऱ्यांनी जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी शासनाकडे मावेजा मिळाल्या नंतरच काम सुरू करा म्हणून सदरील काम बंद केले आहे.
या रोडवरून एकलारा, धनज, जामखेड, नांदगाव, आडलुर, हिब्बट मोटरगा, माऊली, उच्चा, केरूर, तांदळी, बोरगाव या गावातील विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध प्रवासी प्रवास करतात.
उखडुन सोडलेल्या अत्यंत खराब रस्त्यांमुळे गेल्या ५ वर्षांपासून या प्रवासी नागरिकांना महामंडळाच्या लालपरीसह इतर वाहणाच दर्शनच नाही परिणामी या मार्गावरील प्रवाशांना अक्षरशः चालत जावे लागते आहे.या नागरिकांनाच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार व विद्यमान लोकप्रतिनिधीना कसलेही तमा नसावी हे मात्र शोकांतिका आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधीना लेंडी प्रश्नांबाबत मुंबईत विशेष बैठक लावली पण हिब्बट रोडवरील शेतकऱ्यांसाठी बर शब्द बोलायला वेळ नाही किंवा शेतकऱ्यांसोबत संवाद साधता येत नाही ? अशा प्रश्न शेतकऱ्यांतुन निर्माण होत आहे.
तर या मार्गावरील लोकांनी विद्यमान लोकप्रतिनिधीना मतदान केले नाही का. ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. नुकतेच संपन्न झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या भागातील नागरिकांनी विद्यमान सरकारच्या व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सत्ताधारींना नापसंती दाखवली होती हिच परिस्थिती होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीना रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दैनिक तरुण भारत च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.