श्रीगणेश व भगवान शिवाची मनोभावे आराधना करा
ह.भ.प.अर्जुन महाराज मोठे यांचे प्रतिपादन
भोकरदन : दि.२४ जुलै रोजी फिरती चतुर्थी उपक्रमांतर्गत मौजे अवघडराव सावंगी येथे दर चर्तुर्थीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ह भ प अर्जुन महाराज मोठे पळशीकर यांच्या कीर्तन सेवा संपन्न झाली असता महाराजांनी किर्तन सेवेसाठी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती,वाचे वदता शिवनाम,तया न बाधी क्रोधकाम,धर्म अर्थ काम मोक्ष,शिवा देखता प्रत्यक्ष,एका जनार्दनी शिव,निवारी कळिकाळाचा भेव,या संतहद्यसम्राट शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगातील भगवान शिवजींचे श्रीगणेशाची मनोभावे आराधना केल्याने ही दोन्ही दैवत भोळी असून ताबडतोब भक्तांवर प्रसन्न होतात दया करतात
अवघडराव सावंगी येथे पाताळेश्वराचे मोठे मंदिर असल्याने महाराजांनी हा अभंग घेतला व पाताळेश्वराची भक्ती म्हणजे गणरायाप्रमाणे साधी भोळी भक्ती असून आपण मनोभावे भक्ती केल्यास पाताळेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आणि शिवाचा नामाचा तुम्ही जर नित्य नेमाने जप करीत राहिला तर तुम्हाला कोणताच क्रोध तुमच्या अंगाला शिवत नाही महादेव हे भोळे दैवत म्हणजे शहाणे दैवत आहे व भक्तावर नेहमी दया करते याप्रकारे चालू असलेल्या फिरती चतुर्थी उपक्रमाचेही त्यांनी आपल्या कीर्तनातून भरभरून कौतुक केलं कारण धर्म जागृत ठेवण्यासाठी असे उपक्रम राबविणे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाची दखल साक्षात पांडुरंग परमात्मा घेत असतो
व निर्वीघ्न तसेच निर्वीकारपणे भक्तावर आपली छाया कायम ठेवतो. अशाप्रकारे अनेक संत साहित्याचे दाखले देऊन महाराजांनी अत्यंत कमी वेळेमध्ये व सुशब्दामध्ये किर्तनाचे निरूपण केल्याने सर्व भाई भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.किर्तन सेवेनंतर महंत ह भ प दौलत रामजी बाबा यांनी मार्गदर्शन केले व आभार ह भ प विष्णु महाराज सास्ते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गायकवाड व गुनिजन महाराज मंडळी तसेच परिसरातील भाई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पुढील चतुर्थीचे आयोजन मौजे जळगाव सपकाळ येथे असुन त्यांना आयोजकांच्या वतीने श्रीफळ देण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे गावकऱ्यांनी केल्यामुळे गावकऱ्यांचेही महाराजांनी आभार व्यक्त केले.