अमरावती, 14 जुलै, (हिं.स.) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आमदार यशोमती ठाकुरांना न बोलवताच मंत्रालयात अमरावती जिल्हयातील विकासकामाची बैठक घेतली हा ठाकुरांचा आरोप म्हणजे केवळ नौटंकी आहे, यशोमती ठाकुरांना बिनबुडाचे आरोप करण्याचे व्यसनच जडले आहे असा आरोप प्रदेश महाराष्ट भाजपाच्या कार्यकारीणी सदस्य निवेदिता चौधरी यांनी केला. पुढे त्या म्हणाल्या की, यशोमती ठाकुर यांना केवळ बिनबुडाचे आरोप सरकारवर करण्यातच स्वारस्य आहे.पालकमंत्री घेत असलेल्या अमरावती जिल्हयाच्या महत्वपुर्ण डिपीडीसी बैठकांना ठाकुर उपस्थितच नसतात त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासुन आमदार असलेल्या तिवसा मतदारसंघातील प्रश्न जैसै थेच आहे.
तिवसा मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यात आमदार ठाकुरांना रस नसुन केवळ त्यांना विकास आराखडयातील अर्थकारणात रस आहे. ज्या दिवशी मुंबईत अमरावतीमधील विकास कामांच्या संबधीत आढावा बैठक सुरु होती. त्या दिवशी आमदार ठाकुर बंळवत वानखडे यांना शरद पवारांची भेट घडविण्यासाठी सिल्वहर ओक वर घेवुन गेल्या होत्या .तिवसा मतदारसंघातील विकास कामांवर लक्ष न देता राष्ट्रीय नेत्या बनण्याच्या नादात आ.ठाकुर यांना बिनबुडाचे आरोप करण्याचे व त्या आरोपांना वृत्तपत्रात छापुन आणाण्याचे व्यसन लागले आहे, असे निवेदिता चौधरी म्हणाल्या.